प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव सध्या आटोक्मयात आहे. तो पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेत दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. यासंबंधी शनिवारी एक आदेश जारी केला आहे.
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी मार्गसूची जारी करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी या मार्गसूचींना मुदतवाढही देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जिल्हय़ात 10 नोव्हेंबरच्या सकाळी 10 पर्यंत मार्गसूचींना मुदतवाढ देण्यात आली आहे.
1 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. बेळगावसह सर्वत्र थाटात दिवाळी साजरी केली जाते. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन तो थोपविण्यासाठी यंदाही साधेपणाने व भक्तीभावाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
राज्य सरकारने कोरोना थोपविण्यासाठी जारी केलेल्या मार्गसूचींचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱयांनी दिला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नागरिक, विविध खात्यांचे प्रमुख, खासगी संघटना, संस्थांनी या नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱयांनी सूचित केले आहे.