वार्ताहर / वंदूर
इंचलकरंजी शहराला दूधगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने दिलेल्या मंजुरीला नागरिकांनी विरोध दर्शवत कागल तालुक्यातील दूधगंगा नदी बचाव कृती समिती कागल तालुका यांच्या वतीने कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.
दूधगंगा नदी बचाव कृती समिती च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही कागल तालुक्यातील दूधगंगा लाभक्षेत्रातील शेतकरी व जनतेच्या वतीने आपणास निवेदन देत आहोत दूधगंगा नदी वरील बिद्री ते सुळकुड पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्यांनी नियोजित इंचलकरंजी पाणीपुरवठा योजनेस तीव्र विरोध करण्याचे ठरवले असून, आजपर्यंत दूधगंगा नदीवर कोल्हापूर , एमआयडीसी, तळंदगे, शिरोली एमआयडीसी या गावाने पाणी या गावानी पाणी नेलेले आहे. तसेच गैबी बोगद्यातून ही पाणी दिले असून भविष्यात दूधगंगा नदी व वेदगंगा नदी काठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
कोल्हापूर व इंचलकरंजी पंचगंगा नदीच्या काठावर असून ती प्रदूषित करण्याचे पाप त्यांनीच केले आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी या धरणात पाणीसाठा कमी झाला होता, त्यावेळी दूधगंगा ,वेदगंगा या दोन्ही खोऱ्यातील गावांना पाण्याची पूर्तता होऊ शकली नाही. भविष्याचा विचार करून इंचलकरंजी पाणीपुरवठा योजनेस सर्वांचा विरोध आहे तरी या योजना तात्काळ रद्द करून या भागातील लोकांना न्याय द्यावा न् अशा संदर्भाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे .
यावेळी कागल तालुका संजय गांधी निराधार अध्यक्ष धनराज घाटगे, वंदूर , बापुसो पाटील सुळकूड, दयानंद स्वामी कसबा सांगाव, तानाजी हेगडे , राजाराम मोरे, सचिन घोरपडे, अरुण तोडकर , आदीसह दुधगंगा नदी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.