ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
गेल्या चोवीस तासात देशात 773 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5,194 वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत 149 जणांनी आपला जीव गमावला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, 139 लॅबमध्ये कोरोनाच्या दररोज 15 हजार टेस्ट केल्या जातात. तसेच होम क्वारंटाइन असलेल्यांची देखील नियमित तपासणी सुरू असून हॉस्पिटलच्या परिसरात अनेक राज्यांनी लॉक डाऊन वाढवले आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचबरोबर कोरोनाच्या लढ्यात आपला जीव जोखमीत घालून रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व उपकरणे दिली जातील. तसेच बांधकाम मजुरांसाठी विशेष निधी जाहीर करण्यात आला असून आत्तापर्यंत दोन हजार मजुरांना निधी वितरित करण्यात आला आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.