ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध जारी केले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गुरूवारी देशात 16 हजार 764 नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1270 रुग्ण असून, सर्वाधिक 450 ओमिक्रॉन बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल 320 दिल्लीत, 109 केरळमध्ये तर 97 बाधित गुजरातमध्ये आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक नसला तरीही तो 70 पट अधिक संक्रमणकारक असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने निर्बंध वाढवले आहेत.
दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली असून, साडेचार लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.