- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांची माहिती
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी सांगितले की, 10 कोटी नागरिकांना लस देण्यासाठी 85 दिवसांचा कालावधी लागला होता. त्यातच ‘सबको टीका, मुफ्त टीका’ अभियानाच्या अंतर्गत केवळ 24 दिवसात 30 तर ते 40 कोटी नागरिकांना लस देण्यासाठी आली.
लसीकरणाची सुरुवात 21 जून रोजी सुरु करण्यात आली. पुढे ते म्हणाले, देशात लसींचा साठा मोठ्या प्रमाणत उपलब्ध करून दिला जात आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 75 टक्के लस खरेदी करून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात मोफत दिली आहे.
- आतापर्यंत 40.64 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
सोमवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 40.64 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मागील 24 तासात 13 लाख 63 हजार 123 जणांना लस देण्यात आली आहे. तर आता पर्यंत 3,03,08,456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात यातील 38,660 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके आहे.