प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारीही पावसाने दुपारी दमदार हजेरी लावली. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. सकाळपासूनच उष्मा वाढला होता. दुपारी आकाशात ढग जमत होते. त्यामुळे पाऊस पडणार अशी शक्मयता असताना शहराच्या काही भागात दमदार पाऊस कोसळला तर काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यामुळे व्यापारी, दुचाकीस्वार यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे पुन्हा पिकांना फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱया पावसामुळे हातातोंडाला आलेली भात पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. बटाटा, सोयाबिन काढणी खोळंबली आहे. पावसातच काही शेतकऱयांनी रताळी, बटाटा आणि सोयाबिन काढले आहे. मात्र, पावसामुळे या सर्वच पिकांना दणका बसला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परतीच्या पावसाच्या या रुद्रावतारामुळे सारेजणच हतबल झाले असून बस कर आता म्हणण्याची वेळ साऱयांवर येऊन ठेपली आहे.
पहाटेच्या वेळी काही प्रमाणात थंडीची चाहुल लागत आहे. त्यामुळे पाऊस जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना सोमवारी दुपारी मात्र कडक उन्ह आणि उष्म्यामुळे सारेजण हैराण झाले होते. उष्मा वाढल्यामुळे पाऊस पडण्याची शक्मयता निर्माण झाली. त्यानंतर साडेतीनच्या सुमाराला दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही भागामध्ये गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावरून वाहत होते.
दसरोत्सवाला सुरुवात झाली असून यावषी अधिक महिन्यामुळे सुगी लवकर आली आहे. ती सुगी करण्यासाठी शेतकरी नियोजन करत असताना दररोज पावसाची हजेरी व्यत्यय निर्माण करणारी ठरत आहे. यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत सापडले आहेत. या अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांबरोबरच पादचाऱयांचीही तारांबळ उडाली होती.