प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्या हाताला काम नाही त्यांची उपासमार होऊ नये याकरता जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आवाहन करून सातारा पालिकेने धान्य व काही साहित्य दानशूर व्यक्तीकडून गोळा केले.मात्र, हे गोळा केलेले साहित्य नेमके कोणाला वाटले जाते याचा काही पत्ताच नगरसेवकांना लागत नाही.त्यांच्याकडुन मागवण्यात आलेल्या यादीतील एकाही नागरिकाला दिले गेले नसल्याने तीव्र नाराजी नगरसेवकांनी व्यक्त करत आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबिनमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.उद्या त्यावर बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.
सातारा शहरात लॉक डाऊनमुळे सगळे उधोग व्यवसाय बंद आहेत.ज्याचे हातावर पोट आहे त्यांचे पोटाचे हाल होऊ नयेत म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार सातारा पालिकेने आवाहन केले.दानशूर व्यक्तींनी पालिकेकडे मदत केली.मात्र, ही मदत शहराबाहेर होत असल्याने नगराध्यक्षा माधवी कदम यांची आज नगरसेवक रवी ढोणे, धनंजय जांभळे यांनी भेट घेतली.सुमारे दोन तास बैठक झाली.त्यामध्ये नगरसेवकांनी सातारा शहरातील ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना अगोदर वाटा, शहरातील बाजूला ठेवून शहराबाहेरील नागरिकांना अगोदर का वाटता?,कोणकोणला वाटले ते दाखवा अशी मागणी केली.त्यावर उद्या बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ असे ठरले. उशिरा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी या बैठकीला हजेरी लावली.