गेल्या दोन दिवसांपासून धुक्मयाच्या प्रमाणात वाढ, बागायतदार शेतकऱयांमध्ये वाढली चिंता : काजू उत्पादन घटण्याची शक्यता
वार्ताहर / किणये
गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. तसेच धुक्मयाच्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे काजू व आंब्याचा मोहर खराब होऊ लागला आहे. यामुळे बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे. बेळगाव तालुक्मयात काजू व आंब्याचे उत्पन्न बऱयापैकी घेण्यात येते. यावषी चांगला मोहर बहरून आला होता. मात्र, सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱयांमध्ये चिंता पसरली आहे.
शेतकऱयांच्या अर्थव्यवस्थेमध्ये फळबागेला अधिक महत्त्व आहे. तालुक्मयातील शेतकरी आपल्या शिवारामध्ये काजू व आंब्याच्या बागायती बनवून त्यावर अनेकांचे संसार अवलंबून असतात. उन्हाळय़ात या दोन्ही बागांची राखण करून काजू व आंब्याच्या उत्पादनातून त्यांचे वर्षभराचे अर्थकारण चालू असते.गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून काजू व आंब्यांच्या झाडांना मोहर येण्यास प्रारंभ झाला. सध्या काही शिवारांमधील काजूच्या व आंब्यांच्या झाडांना फळधारणा होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱयांच्या चेहऱयावर आनंद दिसून येत होता. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला आहे. तसेच रात्री व पहाटेच्या वेळी दाट धुके दिसू लागले आहे.
या धुक्मयामुळे बहरून आलेला मोहर खराब होऊ लागला आहे. फळधारणा होण्याआधीच मोहर खराब झाला तर उत्पादनात घट होणार असल्याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बोकनूर, यळेबैल, राकसकोप, बाची, उचगाव, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, कर्ले, बहाद्दरवाडी, किणये, रणकुंडये, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी, वाघवडे, संतिबस्तवाड, झाडशहापूर आदी परिसरात काजूचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यात येते.
माळरानावरील शिवाराच्या बांधांवर बहुतांशी शेतकऱयांनी काजूच्या बागायती तयार केलेल्या आहेत. सध्या काजूच्या झाडांना मोहर येऊ लागला असल्यामुळे बागेची राखण करण्यासाठी काही शेतकरी बागेची साफसफाई करू लागले आहेत. बहरून आलेला मोहर अचानक तपकिरी रंगाचा होऊन खराब होत असल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. धुक्मयाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे हा मोहर खराब होऊ लागला असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली आहे..
तालुक्मयाच्या काही भागात आंब्याच्या बागायती आहेत. काही शेतकऱयांनी या बागायतींमध्ये कलमी झाडांचा प्रयोगही केलेला आहे. सध्यातरी धुक्मयाचे प्रमाण कमी झाल्यास मोहर टिकून राहील व त्याला चांगली फळधारणा होईल, असे मनोगत शेतकऱयांनी व्यक्त केले आहे.
योग्य हमीभाव मिळण्याची गरज
गतवषी काजूला प्रतिक्विंटल 9 हजार ते 9 हजार 500 रुपये असा दर मिळाला होता. काही शेतकऱयांनी काजू साठवून ठेवली होती. काजू साठा केलेल्या या शेतकऱयांना मात्र 10 हजार 800 ते 11 हजार रुपये याप्रमाणे दर मिळाला होता, अशी माहिती बेळगुंदी भागातील काही शेतकऱयांनी दिली आहे. मागील वर्षाचा काजूचा दर हा शेतकऱयांना न परवडणारा होता. यामुळे उत्पादन बऱयापैकी मिळूनही काजूला चांगला हमीभाव मिळाला नसल्यामुळे उत्पादक शेतकऱयांचे नुकसान झाले. यावर्षी निसर्गाने बऱयापैकी साथ द्यावी व काजूला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.