उदय सावंत/वाळपई
गेल्या चार दिवसांपासून मेळावलीत आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन हिंसक पद्धतीने सुरू होते, तिथे काल शुक्रवारी शांतता दिसून आली. आंदोलक रानामध्ये दबा धरून जमीन सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱया पथकाची वाट पाहत होते. मात्र हे पथक न आल्याने संघर्ष टळल्याचे दिसून आले. गावाकडे जाणाऱया तीनही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करुन नाकाबंदी करण्यात आल्याने गावात पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.
पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आलेली आहे. येणाऱया काळात उर्वरितानाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस खात्याच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विश्वेश परब यांची प्रकृती ढासळली
या आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विश्वेश परब यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल सोमवारी देण्यात येणार आहे. दरम्यान विश्वेश परब यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना म्हापसा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
विश्वेष परब, शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक
आतापर्यंत आंदोलनकर्त्या तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरितांना टप्प्याटप्प्याने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्यातरी पोलीस खात्यातर्फे 21 जणांची यादी प्रसारित करण्यात आलेली आहे. यामध्ये वाळपई काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांजरेकर, महिला काँग्रेस अध्यक्ष रोशन देसाई, काँग्रेसचे कार्यकर्ते रणजीत राणे, जनार्दन भंडारी, संकल्प आमोणकर, आरजी संघटनेचे प्रमुख मनोज परब व इतरांचा समावेश आहे. 21 जणांपैकी वाळपईचे विश्वेष प्रभू परोब आणि पणजीचे शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये मेळावलीवासीय अधिक
गुन्हा दाखल केलेल्यांत रामा काणकोणकर, डायना त्रावासो, शंकर देवळी, निखिता नाईक, उन्नती मेळेकर, पुजा मेळेकर, संध्या मेळेकर, शुभम शिवोलकर, प्रियेश नाईक, शशिकांत सावर्डेकर, शशिकला सावर्डेकर, विश्वेष प्रभू परब, दशरथ सांगोडकर, रणजित राणे, जनार्दन भंडारी, दशरथ मांदेकर, संकल्प आमोणकर, सचिन भगत, रोशन देसाई, मनोज परब, रोहन कळंगुटकर व इतर ग्रामस्थ असा उल्लेख करण्यात आला आहे.
आंदोलकांनी शुक्रवारी घेतला वेगळा पवित्रा
आंदोलक दर दिवशी मुरमुणे या ठिकाणी आंदोलन करीत होते. मात्र आंदोलनकर्त्यांनी काल मुरमुणे ही जागा सोडून रानामध्ये जाऊन आंदोलन केले. यामध्ये धामसे व अनेक गावांतील लोकांचा समावेश होता. संध्याकाळपर्यंत हे आंदोलक आरेखन करणाऱया पथकाची वाट बघत होते. मात्र सदर पथक संध्याकाळी उशिरापर्यंत आरक्षणाचे काम करण्यासाठी न आल्यामुळे संध्याकाळी उशिरा आंदोलनकर्त्यांनी घरी जाण्याचा मार्ग पत्करला.
गुळेलीत नाकाबंदी, दहा जणांना अटक
शेळ मेळावली भागाकडे जाणाऱया सर्व रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. नाक्मयांवर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गुळेली पंचायत क्षेत्रातील नागरिक वगळता इतर भागातील नागरिकांना या भागांमध्ये जाण्यास मनाई करण्यात येत आहे. काहीवेळा पंचायतक्षेत्रातीलही नागरिकांना अडविण्याचे प्रकार घडत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुळेली पंचायतक्षेत्र वगळता इतर भागातून येणाऱया दहापेक्षा अधिक नागरिकांना खबरदारीची उपाययोजना म्हणून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. नाकाबंदी करण्यात आली असतानाही काही नागरिक जबरदस्तीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
आरजी गोवन्स संघटनेचा पोलिसांनी घेतला धसका
आरजी गोवन्स या संघटनेचा गोवा सरकारच्या पोलीस खात्याने धसका घेतलेला आहे. बुधवारी वाळपईच्या पोलीस स्थानकावर नेण्यात आलेल्या मोर्चामध्ये सदर संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. हा मोर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यामुळे पोलीस यंत्रणेवर बऱयाच प्रमाणात ताण निर्माण झाला होता. आता सदर कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्मयता असल्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सदर भागांमध्ये जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला होता. सदर संघटनेचे अनेक कार्यकर्ते मेळावलीत घुसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे उशिरा मिळालेल्या माहितीनुसार समजते.
प्रकाश वेळीप यांची मध्यस्थी अयशस्वी
गोवा मागासवर्गीय महामंडळाचे चेअरमन प्रकाश वेळीप यांनी गुरुवारी संध्याकाळी शेळ मेळावलीत येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. आंदोलनकर्ते आपल्या अटीवर ठाम असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे सरकार अनेक स्तरावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे प्रकाश वेळीप यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले.