मोरांकडून भाजी, फ्ढळे उत्पादनाची नासाडी : बंदोबस्त करण्याची शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीत मोरांचा उपद्रव वाढला असून ते भाजीपाला, फ्ढळे खाऊन नसाडी करत असल्यामुळे आता शेती करणे कठीण बनले आहे. बागायतीत मोठय़ा प्रमाणात मोरांचा उपद्रव वाढला असून यामुळे शेतकऱयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक शेतकऱयांनी भाजी उत्पादनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उपद्रव देणाऱया मोरांचा सरकारने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे.
वन्य पशूंच्या उपद्रवामुळे गेल्या दहा वर्षांपासून सत्तरीत शेतकरी शेतीकडे पाठ फ्ढिरवू लागले आहेत. वन्य पशूंना उपद्रवी घोषित करा व त्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. यासाठी अनेक स्तरावर निवेदने सादर केली, मोर्चे काढले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. वन्यपशूपैकी रानडुक्कर, गवे, माकड व शेकरू यांचा उपद्रव वाढला होता. यामध्ये आता मोरांची भर पडली असल्याचे येथील शेतकऱयांनी सांगितले.
सत्तरीत मोरांचा उपद्रव वाढला असून भाजी उत्पादन करणे शक्मय नाहे. भाजी उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर येणारी फुले तोडून मोर नुकसान करतात. मोठय़ा येणाऱया मोरांना आवरणे कठीण बनले आहे. यामुळे भाजी उत्पादन कसे करावे असा प्रश्न शेतकऱयांनी उपस्थित केला आहे.
घरच्यांसाठी भाजी लागवड करणेही बनले कठीण्
गेल्या दोन वर्षापासून मोरांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे घरात वापरण्यासाठीदेखील भाजी लागवड करणे महागात पडू लागले आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण मोठय़ा प्रमाणात भाजी करीत होतो. त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदललली आहे. बाजारपेठेमध्ये भाजी विकणे सोडाच घरात आवश्यक असलेली भाजी करणे सुद्धा मोरांमुळे शक्मय नसल्याचे करंझोळ येथील भाजी उत्पादक बातू गावडे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षापासून मोरांची संख्या वाढू लागली आहे. मध्यंतरी मोर दिसणे दुर्मिळ बनले होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक ठिकाणी मोरांचा उपद्रव वाढला आहे. भाजी उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. खास करून मिरची उत्पादनावर मोरांचा उपद्रव अधिक असतो. यामुळे गावठी मिरची करणे शक्मय नसल्याचे शिगंणे येथील शेतकरी महादेव गावस यांनी सांगितले.
सत्तरीतील जमीन सुपीक असून येते गावठी मिरची उत्पादनाला मोठा वाव आहे. एकेकाळी सत्तरीत मोठय़ा प्रमाणात गावठी मिरचीचे उत्पादन केले जात होते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. मोरांचा उपद्रव वाढल्यामुळे मिरची करणे शक्मय नाही. परिणामी मिरची बाहेरून आणावी लागत आहे. मोरांच्या बंदोबस्तासाठी जाळे लावले जाते परंतु मिरची उत्पादनापेक्षा जाळ्यांचा खर्च अधिक असल्यामुळे ते करणे शक्य नाही. सरकारने मोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महादेव गावस यांनी केली आहे.