प्रतिनिधी/ बेळगाव
पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्हय़ात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी मलप्रभा नदीकाठावरील विविध गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
सौंदत्ती तालुक्मयातील नविलुतीर्थ धरणाला भेट देऊन धरणातील सध्याचा पाणीसाठा, विसर्ग आदींविषयी अधिकाऱयांकडून त्यांनी माहिती घेतली. वाढत्या पाणीसाठय़ावर अधिकाऱयांनी सतत लक्ष द्यावे. पाणी सोडण्याआधी नदीकाठावरील गावांना व संबंधित अधिकाऱयांना माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली.
यावेळी नविलुतीर्थ धरणाचे कार्यकारी अभियंते कृष्णाजी राव उपस्थित होते. बैलहोंगल येथील काही भागांना भेटी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी नयानगर पुलाची पाहणी केली. रामदुर्ग तालुक्मयातील हिरेहंपीहोळी व चिक्कहंपीहोळी येथील 51 कुटुंबीयांना सुरेभान येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
सुरेभान एपीएमसी आवारात 12 कुटुंबीय व हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रात 39 कुटुंबांना आश्रय देण्यात आला आहे. त्यांना वेळेत जेवणखाण पुरविण्याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा पुरविण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली.
निवारा केंद्रांना मास्क, सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर आदी उपकरणे पुरविण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रात आशा कार्यकर्त्यांसह पाच जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी रामदुर्गचे आमदार महादेवप्पा यादवाड यांनीही अधिकाऱयांना सूचना केल्या.
आमदार व जिल्हाधिकाऱयांनी गोनागर येथील निवारा केंद्रांना भेटी देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली. या केंद्रात 48 कुटुंबातील 200 हून अधिक जणांनी आश्रय घेतला आहे. सध्या पुराचा धोका नाही. मात्र, खबरदारी म्हणून सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती बैलहोंगलचे प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री यांनी यावेळी दिली.
लोळसूर पुलाची पाहणी
गोकाक येथील काही भागात पावसाचे पाणी शिरले आहे. उप्पार गल्ली, कुंभार गल्ली परिसराला जिल्हाधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली. याचवेळी लोळसूर पुलाला भेट देऊन पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली आहे..