नांद्रे / प्रतिनिधी :
विरोधीपक्ष नेते फडवणीस, दरेकर आज सांगली दौर्यादरम्यान नांद्रे येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला असता पूरग्रस्तांनी प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामा करावा परंतु जाचक अटी न घालता 20 हजार रूपये सानुगुह आनुदान द्यावे. तसेच महापूर व कोरोनामुळे सलग तीन वर्ष पूरग्रस्त, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिकांना मोठा फटका बसलेला आहे.
आता महापूराच्या पाण्यात पिके गेल्याने शेजाऱ्यांची शेती उदध्वस्त झाली असून सरसकट हेक्टरी 1 लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच इनाम, देवस्थान जमिनीवरील पीकास पीककर्जे व इतर कर्जे जिल्हा बँकेसह, अन्य बँकानी देणे बंद केले आहे. ती सर्व कर्जे देणे सुरू करावीत.
सन 2019ला आलेल्या महापूरात अनेक पूरग्रस्तांना वंचित ठेऊन बोगस पूरग्रस्तांना लाभ देण्यार्या अधिकार्याला निलंबित करावे व वंचित पूरग्रस्तांना लाभ मिळावा अशा मागणीचे निवेदन राहुल सकळे, किरण पाटील, बाळासाहेब पाटील, सतिश हेरले, मुकेश चिंचवाडे यांच्यासह नागरिकांनी विरोधीपक्ष नेते फडवणीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांना दिले. यावेळी खासदार संजय काका, पुथ्वीराज देशमुख, उपस्थित होते. या प्रसंगी विरोधी पक्ष नेते फडवणीस, दरेकर म्हणाले, नांद्रेकरांची मागणी योग्यच आहे व मिळालीच पाहिजे आपली मागणी सरकारला मान्यच करावी लागेल.