नियंत्रणाच्या बोजवाऱयाने वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट : वाहने-नागरिकांच्या तुलनेत पोलीसबळ अपुरे : सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने पुढे येणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांची खोदाई, दुसरीकडे खड्डय़ांनी व्यापलेले रस्ते आणि तिसरीकडे वाहनांची प्रचंड वर्दळ यामुळे बेळगावच्या वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडाला आहे. वाहनांची आणि नागरिकांची संख्या यांच्या तुलनेत अपुरे पोलीस बळ यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट होत चालला आहे. वाहतुकीचे नियम दुसऱयासाठी आणि सर्व रस्ते आमच्यासाठी अशा भ्रमात वाहने हाकणाऱयांना कोणी आवरायचे, हा प्रश्न आहे. त्यातच खरेदीला येत असलेले उधाण वाहतूक कोंडीमध्ये भर टाकत आहे.
खरेदी आणि गर्दी यांचे जणू समीकरणच झाले आहे. शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी ही आगामी कोरोनाच्या तिसऱया लाटेला निमंत्रण देणारी ठरणार यात शंका नाही. वाढत्या गर्दीमुळे बाजारपेठेत कमालीची कोंडी होत आहे. गर्दी व वाहतुकीवर त्वरित नियंत्रण आणणे अत्यावश्यक झाले असून गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी नवीन समस्या निर्माण करण्याची शक्मयता नाकारता येत नाही. याच गर्दीमुळे चोऱयांचे प्रमाणही वाढले
आहे.
खरेदीसाठी येणाऱयांना वाहने कुठे पार्क करायची, हा प्रश्न नेहमीचाच आहे. मात्र, त्यांच्यामध्येही शिस्तीचा अभाव असून वाहने कोठेही, कशीही पार्क केली जातात. बेशिस्तीने उभे केलेल्या वाहनांचे वाहतूक पोलीस टोईंग करतात आणि वाहने उचलून पोलीस स्थानकात आणून ठेवतात. परंतु ही मोहीम काही मोजक्मयाच ठिकाणी म्हणजेच समादेवी गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, देशमुख रोड-टिळकवाडी, कधी कॉलेज रोड येथेच राबवित असल्याचे दिसून येत आहे. परंतु उर्वरित शहरात वाहनांची प्रचंड कोंडी झालेली दिसून येते.
दुचाकीस्वार आपला हेका सोडत नाहीत
दरम्यान, वाहतुकीचे नियम पाळायचे कोणी, हाही प्रश्न आहे. पोलीस जिथे नाहीत तेथे सर्रास हेल्मेटविना, मास्कविना दुचाकीवरून तिघांनी फिरणे हे प्रकार सुरू आहेत. रेल्वे फाटकाजवळ होणारी कोंडी ही केवळ नागरिकांनाच नव्हे तर पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरली आहे. एका बाजूने वाहने जाणे आणि पलीकडून वाहने येणे हा खरेतर वाहतुकीचा नियम. परंतु चार चाकीच्या मागे दुचाकीचालक आपले वाहन कधीच थांबवत नाहीत. चार चाकीच्या बाजूने वेगळी रांग तयार करतात आणि त्याचा फटका सर्वांनाच बसतो. तेथे वाहतूक कोंडीची समस्या प्रामुख्याने उद्भवते. पोलिसांनी सांगूनही वाहनचालक प्रामुख्याने दुचाकीस्वार आपला हेका सोडत नाहीत.
एकूणच शहरातील पार्किंग व्यवस्था, वाहन तळ, वाहतूक कोंडी यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. लॉकडाऊन नसल्याने आणि शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या शक्मयतेमुळे विद्यार्थीसुद्धा परतत आहेत. त्यांच्या वाहनांचीसुद्धा रस्त्यांवर भर पडली आहे.
एकूण परिस्थितीचा अंदाज घेता वाहन आणि नागरिक यांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. शहरातील मध्यवर्ती भागाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमलेले दिसतात. कोरोनामुळे पोलिसांना विश्रांती किंवा सुटी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते वैतागले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास त्यांचे काम वाढणार आहे.
नागरी पोलीस संकल्पना आवश्यक
नागरिकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. म्हणजेच जेथे पोलीस नसतील, प्रामुख्याने उपनगर परिसरात नागरिकांनी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. राज्यात काही शहरांमध्ये हा प्रयत्न सुरू झाला आहे.
यापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख हेमंत निंबाळकर, संदीप पाटील व सोनिया नारंग यांनी आपल्या कारकिर्दीत असा उपक्रम सुरू केला होता. तो कालांतराने थंडावला. मात्र, बेळगावमधील वाहनांची वाढती संख्या आणि होणारी कोंडी पाहता हा उपक्रम येथे होणे आवश्यक आहे.
सर्व कामे लवकरच उरकून घेण्याकडे कल
कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. त्यावेळी कदाचित पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्मयता नागरिकांनी गृहीत धरली आहे. त्यामुळे शक्मयतो सर्व खरेदी आणि कामे लवकरच उरकून घेण्याकडे त्यांचा कल आहे. परिणामी दिवसागणिक शहरात गर्दी वाढते आहे. सामाजिक अंतर आता कागदावर राहिले आहे. मास्क नाकावर नाही तर तोंडावर आला आहे. लॉकडाऊन नको म्हणणाऱया प्रत्येकाने याचा विचार करणे व आपण या गर्दीचा भाग न होणे हेच श्रेयस्कर.