ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना व्हायरस संपूर्ण देशात फैलावत असताना सरकारकडून हे संकट रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. यातच आता केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या गोडाऊन मधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायझर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करीत असताना केंद्र सरकारने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतलाय. सॅनिटायजर आवश्यक आहे, त्याचे उत्पादन करायलाच हवे.
परंतु या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरिबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरित मजुरांसाठी देऊ शकतो, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली आहे.
तसेच लॉक डाऊनच्या काळात रोजंदारी भत्ता आणि हातावर पोट असणाऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणात काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिधावाटपाच्या दुकानांमध्ये यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. पण यामध्ये काही सुधारणा सुचवत काही नवे पर्याय पुढे आणले आहेत.