नगरोटा चकमक : भारतीय सुरक्षादलाच्या शौर्याचे पंतप्रधानांकडून कौतुक : 26/11 दिवशी संभाव्य घातपाताचा कट फसला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्या दिवशीच म्हणजे 26 नोव्हेंबरला देशात मोठा घातपात घडवण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता, अशी माहिती उजेडात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत पाकिस्तानचे नाव घेत ‘नापाक’ कट व्यर्थ ठरल्याचे वक्तव्य करत भारतीय सुरक्षादलाच्या शौर्याचे कौतुक केले आहे.
सुरक्षा दलांनी गुरुवारी पहाटे नगरोटामध्ये चार दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. सुरक्षा दलांनी नगरोटाजवळील बन टोलनाक्मयावर त्यांचा खात्मा करत कट उधळून लावला आहे. काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याच्या हेतूने दहशतवाद्यांनी ट्रकमधून मोठय़ा प्रमाणात शस्त्रे आणली होती. सुरक्षा दलांनी दोन तासांतच दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते ट्रकमधून शस्त्रसाठा घेऊन श्रीनगरला जात होते. ते ट्रकमधील तांदळाच्या गोण्यांच्या आड लपले होते. सुरक्षा दलांना संशय येऊ नये म्हणून ट्रकवर जम्मू-काश्मीरचाच नंबर लावण्यात आला होता, असे सुरक्षा दलाच्या वरि÷ अधिकाऱयांनी सांगितले.
वरिष्ठ पातळीवर आढावा बैठका
नगरोटा चकमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर खात्यातील महत्त्वाच्या अधिकाऱयांचा सहभाग होता. या बैठकीत काश्मीरमधील सध्याची सुरक्षा यंत्रणा, दहशतवाद्यांचे अड्डे, घुसखोरीच्या घटना, स्थानिकांचे पाठबळ अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधानांनी घेतले पाकिस्तानचे नाव
जम्मू-काश्मीरमधील नगरोटा चकमकीत सुरक्षा दलाने पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमदच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात पाकिस्तानचे थेट नाव घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासंबंधी सलग दोन ट्विट केली आहेत. जैश-ए-महंमदच्या दहशतवाद्यांनी ज्या उद्देशाने भारतात प्रवेश केला होता, त्या कट-कारस्थानावर भारताच्या सतर्क सुरक्षा दलाने पाणी फिरवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पाकिस्तान जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भारतात आतंक (दहशतवाद) पसरवत असल्याचा हल्लाबोलही पंतप्रधानांनी केला. जम्मू-काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही व्यवस्थेला लक्ष्य करणाऱया धूर्त कटास सुरक्षा दलाने पराभूत केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
‘पीओके’तील कारवाईबाबत संभ्रम
भारतीय सुरक्षा दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिली होती. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनेही ‘पिनपॉईंट स्ट्राईक’ असा उल्लेख करत वृत्त दिले होते. मात्र भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने हे वृत्त खरे नसून सुरक्षा दलाने अशी कोणतीही कारवाई केली नसल्याची स्पष्टोक्ती दिल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.