प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात 23 ऑगस्टपासून नववी, दहावी तसेच अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्याची सूचना सरकारने केली आहे.
23 ऑगस्टपासून 9 ते 12 पर्यंत वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी नूतन शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा विचार करून त्यांच्या पालकांनाही प्राधान्याने लस देण्याची सूचना आरोग्य विभागाने दिली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना यापूर्वीच लस देण्याची सूचना करण्यात आली होती. जवळपास सर्व शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. आता नववीपासूनचे वर्ग नियमितपणे सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना प्राधान्याने लस देण्याची सूचना आरोग्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांना दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी लस घेतलेली नाही, अशा पालकांना प्राधान्याने लस द्यावी, असे आदेशपत्रकात म्हटले आहे.