वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाईची गरज भासल्यास वायुदल सदैव सज्ज असल्याचे उद्गार वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी काढले आहेत. भारताच्या कारवाईची भीती त्यागावी असल्यास पाकिस्तानने दहशतवादाची पाठराखण थांबविणे गरजेचे असल्याचे भदौरिया यांनी म्हटले आहे.
लडाखमध्ये असाधारण घडामोडी घडल्या होत्या. अशा घटनांवर आम्ही नजर ठेवतो आणि गरज भासल्यास कारवाईही करतो असे त्यांनी सांगितले आहे. 9 मे रोजी सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. तसेच लडाखमध्ये चिनी हेलिकॉप्टर्सनी घुसखोरी केली होती.