किरण कांदोळकर यांची काँग्रेसवर टीका
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रेजीनाल्ड हे परभूत उमेदवार म्हणून जे विधान केले आहे त्यातूनच चिदंबरम यांचा मुर्खपणा सिध्द होतो असे तृणमूल काँग्रेसचे किरण कांदोळकर यांनी सांगितले. चिदंबरम यांच्या या वक्तव्यचा तृणमूल काँग्रेस पक्ष निषेध करीत असल्याचेही ते म्हणाले. येत्या विधानसभा निवडणूकीबाबत काँग्रेस पक्ष गंभीर नसला तरी गोव्याची जनता केवळ भ्रष्टाचारी भाजपला घरी पाठविण्यासाठी निवडणूकीची आतूरतेने वाट पाहत आहेत असेही कांदोळकर यांनी सांगितले.
काल सोमवारी पणजीतील तृणमूल कँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्राकार परीषदेत किरण कांदोळकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत समील वळवईकर, रेजीनाल्ड, ऍल्था लोबो, आनंद नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सध्यातरी राज्याती कँग्रेस पक्षाची उतरती कळा सुरु झाली आहे. काँग्रेचे नेते भाजपाशी जुळवाजुळव करून पैसा कमविण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे चांगल्या नेत्यांचा किंबहूना समाजाचे कल्याण करू पहाणाऱया नेत्याचां त्यांना अडथळा निर्माण होत आहे. म्हणून अशा नेत्यांना ते बदनाम करण्याचे काम करीत आहेत. पर्यायाने असे नेते आज केवळ मतदारांचे हित लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेस पक्षात येत असल्याचेही कांदोळकर म्हणाले.
काँग्रेस पक्षातून आपण तीनवेळा आमदार झालो मात्र प्रत्येकवेळी विरोधात रहावे लागले. विरोधात असतानाही आपण आपल्या मतदार संघात मोठय़ा प्रमाणात विकासे कामे केली आहेत. काँग्रेस पक्षाने आपली कधीही स्तूती केली नाही. आपल्याला पक्ष समिती अनेक पदे देण्यात आली मात्र सगळी पदे केवळ कागदावरच होती प्रत्यक्षात आपल्या मताचा विचारच केला जात नव्हता. असे रेजीनाल्ड यांनी सांगितले.
रेजीनाल्ड हे तडफदार नेते आहेत. नियमितपणे ते जनतेच्या कामासाठी झटत असतात. विधानसभेत नेहमी ते काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्ताधारी मंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार करीत होते. किंबहुना मंत्र्यांना ते पळताभुई थोडी करीत होते. वास्तवीक अशा नेत्याला वेळोवेळी सहाय्य करणे जरुरीचे होते. मात्र काँग्रेस पक्षात ते होत नव्हते. पुढील काळात काँग्रेस सत्तेत आल्यास रेजीन्लड मंत्रीपदाला दावेदार होईल म्हणून त्याचे नेहमी पाय ओडण्याचा प्रयत्न होत होता. त्याच्या विरोधात अनेक कुंभाड रचली जात होती असे ऍल्था लोबो यांनी सांगितले.