बाहेरून आल्याच कळलं की मारलाच शिक्का
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात अजून ही स्थानिक नागरिक सुरक्षित ठेवण्यात पालिका प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने यश आले आहे असेच म्हणावे लागेल.जे लोक बाहेरून आले तेच आणि त्यांच्या सहवासात आले तेच बाधित आल्याचे दिसून येत आहे.सध्या पुणे, मुंबईतून येणायांची ग्रामीण भागात मोठी संख्या आहे.मात्र, शहरात ही संख्या अगदी नगण्य असून दररोज बाहेरून येणाया नागरिकांची माहिती पालिकेत घेतली जात आहे.बाहेरून आल्याची माहिती मिळताच लगेच हातावर होम कोरोनटाईंनचा शिक्का मारण्यात येतो आहे.पालिकेने ज्यादा संख्या येणायांची झाल्यास पालिका आणि खाजगी शाळांची सोय करून ठेवण्यात आली आहे.दरम्यान, सातारा शहरात कोरोनाला रोखण्यासाठी कृती समिती गठीत करण्यात आली आहे.
शहरात कोरोनाला नो एण्ट्री करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरुवातीपासून कंबर कसली आहे.स्थानिक नागरिकांच्या मदतीने पालिका प्रशासन दिवस रात्र मेहनत घेत आहे.त्यामुळे शहरातील स्थानिकांना कोरोनापासून दोन हात लांब ठेवण्यात यश आले आहे.जे बाधित आहेत ते बाहेरून आलेले आणि बाहेरच्या नागरीकांच्या संपर्कात आलेले आहेत.असे असताना सध्या मुंबई, पुणे येथून सातारा जिह्यात येणायांची संख्या वाढत असल्याने चिंता एका बाजूला व्यक्त होत आहे.मात्र ग्रामीण भागात ज्या प्रमाणात मुंबई, पुणे येथील नागरिक येत आहेत त्या प्रमाणात शहरात येत नाहीत अशी माहिती पुढे येत आहे.जरी आगामी काळात बाहेरून येणायाची सातारा शहरात येणायांची संख्या वाढली गेली तर त्यांच्याकरता सातारा पालिकेने पालिकेच्या 17 शाळा व काही खाजगी शाळेमध्ये कोरोन टाइनची सुविधा करण्यासाठी तयारी केली आहे.त्यामध्ये जे नागरिक बाहेरून येतील त्यांना तेथे राहण्याची सोय करण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.
विना परवानगी येणायावर गुन्हा दाखल केला जातो
जे विनापरवाना शहरात येत आहेत.त्याची माहिती नजीकच्या शेजारी पाजारी लगेच पालिकेला कळवतात.सातारा पालिकेत अशा तक्रारी घेण्यासाठी एक कक्ष तयार करण्यात आला आहे.त्या कक्षात दररोज चार ते पाच तक्रारी येत असतात.दि.2पासून ही नोंद सुरू करण्यात आली आहे. जे नागरिक खोटी माहिती देतात त्यांच्यावर लगेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येतो.ज्यांच्याकडे मेडिकल प्रमाणपत्र आहे त्यांना होम कोरोन टाइन राहण्याच्या सूचना दिल्या जातात असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.
कृती समिती झाली गठीत
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे पत्र शुक्रवारी दुपारी मिळताच सातारा पालिकेने लगेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी कृती समिती गठीत करण्यात आली.त्या समितीच्या अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, सदस्य म्हणून आरोग्य सभापती सौ.अनिता घोरपडे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, शिक्षण सभापती म्हणून उपनगराध्यक्ष किशोर शिंदे,यांच्यासह नगरसेवक तर सचिव म्हणून मुख्याधिकारी शंकर गोरे अशी स्थापन करण्यात आली आहे.तसेच प्रभागनिहाय समित्या गठीत केल्या आहेत.त्यामध्ये नगरसेवक हे अध्यक्ष असून त्या समितीत त्या प्रभागातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, तालीम मंडळाचे सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिला बचतगट, स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी, तर सदस्य सचिव मुख्याधिकारी आहेत.या समितीचे कार्य म्हणजे कार्यक्षेत्रात अनावश्यकरित्या वाहने, खाजगी वाहने, दुचाकीवरून एका प्रभागातून दुस्रया प्रभागात नागरिक जाणार नाहीत यावर समितीने नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या अनवश्यक हालचाली टाळण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट लावावे, त्या ठिकाणी स्वयंसेवक व आवश्यकता असल्यास पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची नेमणूक करण्यात आली आहे.नागरिकांना स्वयंम शिस्त पाळण्याचे बंधनकारक असल्याच्या सूचना दिल्या जात आहेत.समितीच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी बस स्टॉप आदी ठिकाणे निर्जंतुक करण्यात आली.स्वच्छता करण्यासाठी कार्यवाही करावी, आदी कामे समितीकडून सुरू आहेत.
नागरिकांनी स्वतःहून माहिती द्यावी
बाहेरून आलेल्या नागरिकांनी शहरात विना परवाना येऊन राहू नये.लोकांच्या जिवितास धोका होईल असे वर्तन करू नये.नागरिकांनी स्वतः हुन शहरात आल्यास माहिती देऊन सहकार्य करावे.स्वतःबरोबर शहरातील इतर नागरिकांच्या सुरक्षितता घेण्यासाठी ही माहिती द्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.
नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे
सातारा शहरातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षितता प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे.कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी सातारा पालिका प्रयत्न करत आहे.मात्र, बाहेरून जे जे येत आहेत त्यांनी आपली खरी माहिती पालिकेकडे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केले आहे.