नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपद नियुक्तीची प्रक्रिया टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वीच सुरु केली जाईल, असे संकेत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचे करार नोव्हेंबरपर्यंत आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी बीसीसीआय अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संपर्क करण्याची शक्यता चर्चेत राहिली आहे.