फटाक्यांची आतषबाजी, हा दिवाळसणातील आता अविभाज्य भाग बनला आहे. फटाके फोडून वाजतगाजत व धूमधडाक्यात दिवाळीचे स्वागत करण्याचा ट्रेंड मागच्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढलेला पहायला मिळतो. परंतु, कोरोना स्थिती तसेच त्याच्या जनजीवन व अर्थकारणावरील परिणामांमुळे यंदा फटाकेबाजीला लक्षणीय लगाम बसल्याचे दिसत आहे. फटाके उत्पादनाबरोबरच विक्रीतही घट झाली असून, अनेकांनी यंदा फटाक्यांना फाटा दिल्याने प्रदुषणातही या वर्षी मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. फराळाची लज्जत, रांगोळय़ांच्या पायघडय़ा, आकर्षक रोषणाईने दिवाळसणात सारा आसमंत उजळून निघतो. हा उत्सव फटाक्यांमुळे अधिक धमाकेदार होतो. म्हणूनच बच्चे कंपनीपासून थोरा-मोठय़ांपर्यंत अनेकांच्या जिव्हाळय़ाचा विषय असतात, ते फटाके. दीपोत्सवातील ध्वनिप्रदूषण, वायूप्रदुषणाबद्दल सातत्याने जनजागृती करण्यात येत असली, तरी ‘फटाकेविरहित दिवाळी’ ही संकल्पना पुण्या-मुंबईपासून दिल्लीपर्यंत कुठेच अपेक्षेप्रमाणे यशस्वी होताना दिसत नाही. उलटपक्षी दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात का होईना दणदणाट ऐकायला मिळतोच. यंदाची दीपावली मात्र या सर्वाला काहीशी अपवाद ठरताना दिसते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी फटाके उडविण्यावरच बंदी घातली आहे. त्याचा थेट परिणाम स्वाभाविकपणे फटाकेबाजीवर झालेला आहे.
कोरोना नि फटाके
मागच्या मार्चमध्ये महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने प्रवेश केला. बघता बघता देशभर पसरलेल्या या विषाणूने अनेकांचा बळी घेतला, तर काहींच्या आरोग्य यंत्रणेत बिघाड निर्माण केला. कोरोनाचा विषाणू हा प्रामुख्याने फुफ्फुसावर हल्ला करीत असल्याने या आजारात अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्यांना श्वसनास त्रास झाल्याचे दिसून आले. स्वाभाविकच आधीच कमकुवत झालेल्या फुफ्फुसांना फटाक्यांपासून त्रास झाल्यास संबंधित रुग्णास धोका पोहोचण्याची भीती वर्तविली जात आहे. राज्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी फटाक्मयांच्या धूरामुळे कोविड रुग्णांना, श्वसनाचा आजार असणाऱया व्यक्तींचा त्रास आणखी वाढू शकतो. हे पाहता दिवाळी फटाकेविरहित म्हणून साजरी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
फटाक्यांवर फुली
यावर सर्व स्तरावर ऊहापोह सुरू असतानाच काही राज्यांमध्ये फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही यावर्षी फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने हवेच्या गुणवत्तेनुसार फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले. त्यानुसार मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नागपूर व अन्य महापालिकांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. खासगी ठिकाणी कमी क्षमतेचे फटाके वाजविण्याची मुभा आहे. परंतु, एकूणच याचा फटाके उडविण्यावर परिणाम झाला आहे.
उलाढाल यंदा निम्मीच
कोरोनामुळे यंदा अनेकांचा रोजगार गेला. बहुतेकांच्या वेतनातही कपात करण्यात आली. एकूणच कोरोनामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडलेले आहे. त्यामुळे आपोआप हौसेमौजेला लगाम बसला आहे. स्वाभाविकच त्याचा फटका फटाक्मयांच्या बाजारपेठेला बसला आहे. मार्चपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे फटाका कारखान्यांकडून फटाक्मयांची तुलनेत निर्मिती होऊ शकली नाही. परिणामी शहरातील आवकही कमी झाली आहे. त्यातच यंदा फटाक्मयांची उलाढाल निम्मीच झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. विपेते गणेशोत्सवापूर्वीच आवश्यक असलेल्या फटाक्मयांची आवक करत असतात. मार्चमध्ये फटाकानिर्मिती करणाऱया कारखान्यांना आगाऊ पैसे देत असतात. यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे विपेत्यांना पैसे देऊन बुकिंग करता आले नाही. त्याचबरोबर फटाकेनिर्मिती करणारे कारखाने बंद होते. त्याचाही परिणाम जाणवत आहे.
विक्री व्यवसायावर परिणाम
कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात लग्नसराई, यात्रा, जत्रा आणि गणेशोत्सवाचा हंगाम गेल्याने फटाक्मयांची विक्री करणाऱया व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले. दिवाळीचा हंगाम हा फटाका विक्रेत्यांकरिता हुकमी मानला जातो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे या हंगामातही विक्रेत्यांच्या पदरात फार काही पडलेले नाही. काहींना उलट आर्थिक झळ बसल्याचे दिसते. दरवर्षीच्या तुलनेत 40 ते 50 टक्के विक्री कमीच असल्याचे विक्रेत सांगतात. यासंदर्भात पुणे फटाका डिलर्स वेल्फेअर असोसिएशननेही विक्रेत्यांची व्यथा मांडली असून, रोजगाराच्या दृष्टीने बंदीला विरोध दर्शविला आहे.
पर्यावरणपूरक दिवाळी
दरवर्षी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत अनेकविध स्वयंसेवी संस्था वा सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून भर दिला जातो. फटाक्यांच्या प्रदुषणामुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होते. तसेच पर्यावरणाचीही कशी वासलात लागते, यासंदर्भात मागच्या काही वर्षांपासून व्यापक प्रमाणात जनजागृती होत आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम पहायला मिळतात. पर्यावरणपूरक दिवाळीवर अनेक कुटुंबे भर देताना दिसतात. त्यात कोविडमुळे अनेकांना ही आजच्या काळाच्या गरज असल्याची खात्री पटल्याने त्यांच्याकडूनही या उपक्रमास पाठिंबा मिळत आहे.
दणदणाट ओसरला
लक्ष्मीपूजन हा दिवस फटाक्यांच्या दणदणाटाचा मानला जातो. या दिवशी सकाळी व संध्याकाळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी होते. सारा परिसर दणाणून सोडला जातो. या वर्षीचे लक्ष्मीपूजन मात्र नेहमीपेक्षा वेगळे ठरले. दणदणाटाने उगवणारी सकाळ यंदा काहीशी शांत वाटली. दरवर्षीच्या तुलनेते अत्यंत कमी प्रमाणात फटाके वाजवले गेले. यासंदर्भात नागरिकांमध्येही चर्चा दिसून आली.
ध्वनी-वायू प्रदुषणात घट होणार
फटाक्यांमुळे शहरांच्या ध्वनी व वायूप्रदुषणात मोठी वाढ होते. देशातील अनेक महानगरे या प्रदुषणाच्या काजळीने वेढून जातात. हे वर्ष याला अपवाद ठरण्याची शक्यता अधिक आहे. फटाक्यांची खरेदी व प्रत्यक्ष फटाके उडविण्याचे प्रमाण घटल्याने स्वाभाविकच प्रदुषणाचा आलेख घसरणार, हे निश्चित आहे.
अपघातांनाही अटकाव बसणार
दिवाळी म्हटले, की अपघात आलेच. हे अपघात प्रामुख्याने फटाक्यांमुळे होतात. या पार्श्वभूमीवर महावितरणनेही गाईडलाईन दिल्या आहेत. महावितरणची वीजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघडय़ावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्मयांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेटय़ा, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल, असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महावितरणकडून याबाबत घेतली जाणारी काळजी व फटाक्यांना लोकांनीच दिलेला फाटा यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी आशा आहे.
फटाक्यांचे परिणाम
भारतात दीपावली काळात फोडण्यात येणारे फटाके व वायू प्रदूषण याबाबतच्या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक समोर आलेल्या आहेत. फटाक्यांमुळे हवेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साइड, आणि मोनो ऑक्साइड यांसारखे काही घातक पदार्थ हवेत मोठय़ा प्रमाणात पसरतात. त्याचा परिणाम श्वसन यंत्रणा, मेंदूवर होतो. विशेषतः लहान मुले तसेच आजारी आणि अस्थमा व मधुमेह असलेल्या व्यक्ती यामुळे मोठय़ा प्रमाणात बाधित होतात. फटाक्मयामध्ये असणारे अनेक लहान शिशाचे तुकडे हे थेट परिणाम करतात, याकडेही त्यात लक्ष वेधले आहे. याखेरीज सध्या दुसऱया लाटेकडेही अंगुलीनिर्देश केला जात आहे. रुग्णसंख्या घटल्याने बिनधास्त झालेले लोक, प्रदूषण यातून कोरोना पुन्हा उसळणार तर नाही, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण दिवाळीत एकूणच प्रदूषणपातळी कशी राहणार, यालाही महत्त्व असेल.
शिवकाशीतील अर्थचक्र बिघडणार
तामिळनाडू येथील शिवकाशी हे फटाका निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. येथून संपूर्ण देशात फटाके विक्रीसाठी पाठवले जातात. अनेक राज्यांमध्ये दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातल्यामुळे फटाके कारखानदार आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. तामिळनाडूमधील शिवाकाशीमध्ये याबाबत अधिक नाराजीचे वातावरण आहे. कारण देशात विकल्या जाणाऱया फटाक्मयांपैकी 80 टक्के फटाके शिवकाशीमध्ये तयार केले जातात. फटाक्मयांच्या या व्यवसायातून सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळतो. ऑल इंडिया फायरवर्कर्स असोशिएशनच्या माहितीनुसार शिवकाशी येथे 1,070 कंपन्यांची नोंद असून एकटय़ा शिवकाशीत मागील वषी 6 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. संपूर्ण देशाच फटाक्मयाच्या व्यवसायाची उलाढाल 9 हजार कोटी इतकी आहे. शिवकाशीमध्ये या व्यवसायात 3 लाख लोक अवलंबित आहेत. तर एकूण 5 लाख लोकांना यातून रोजगार मिळतो. फटाकेबंदीबाबत बोलताना तामिळनाडू फटाके तसेच एमोर्सेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या अधिकाऱयांनी हा उद्योगाला बसलेला मोठा झटका म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक धोका
राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाने भयानक स्तर गाठला आहे. येणाऱया दिवसांत दिवाळी आहे यातच फटाके वाजवल्यास प्रदूषणासोबत कोरोना ही महामारी भयंकर रूप घेऊ शकते. यामुळेच फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीआर, पंजाब, राजस्थान आणि इतर उत्तर भारतीय राज्ये ही फटक्मयांचे प्रमुख बाजार आहेत. या भागांमध्ये लोक दिवाळी भव्यदिव्य पद्धतीने साजरी करतात. एनजीटीच्या या आदेशाने उद्योगावर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.
दिवाळी आणि फटाके ही तशी पूर्वापार परंपरा नव्हे. अलीकडच्या काळात रूढ झालेली ही प्रथा आहे. फटाक्यांमुळे नाहक पैशाचा चुराडा होतोच. शिवाय पर्यावरणालाही गालबोट लागते, या गोष्टी तशा पूर्वीही समजत होत्या. परंतु, उमजत नव्हत्या, इतकेच. कोविडमुळे जगण्याचे, जीवनशैलीचे संदर्भ बदलले आहेत. गरम पाणी, काढे घराघरात शिजू लागले असून, हेल्थ कॉन्शसपणा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर पर्यावरणही चांगला हवे, हा विचारही हळूहळू कुठेतरी रुजतो आहे. त्यामुळे उद्याची पिढी फटाक्यांशी काहीशी फटकून वागण्याची शक्यता थोडीशी वाढली आहे. अर्थात पुढच्या दिवाळीतच याचे खरे रिझल्ट मिळू शकतील.
संकलन : प्रशांत चव्हाण, पुणे