6 टन फिशमील समुद्रात ओतण्याची नामुष्की
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या काही दिवसात मिरकरवाडा बंदरात सुमारे 800 टन फिशमिलचे घबाड मिळाले. मात्र फिशमीलला किंमतच नसल्यामुळे हे फिशमील पुन्हा समुद्रातच टाकून देण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. फिशमीलचा घसरलेला दर व खरेदीस मिळालेला नकार यामुळे ही नामुष्की आढवली आहे.
काही दिवसापूर्वी 16 रुपये प्रतीकिलो असणारा फिशमीलचा (कुटी) दर अचानक निम्म्यावर म्हणजेच 8 रुपये प्रतीकिलो झाल्यामुळे मच्छीमारांची निराशा झाली आह़े शहरामध्ये फिशमील विकत घेणाऱया 3 कंपन्या आहेत़ एका कंपनीची 300 टन, दुसऱया कंपनीची 100 टन व तिसऱया कंपनीची 50 टन माशंवर प्रक्रीया करण्याची क्षमता आहे. मात्र तब्बल 800 टन मासे मिळाल्याचे समजताच एवढय़ा माशांवर प्रक्रीया करणे शक्य नसल्याने या कंपन्यांनी माल आणू नका, असे मच्छीमारांना सांगितले. याचवेळी पुरवठा वाढल्याने दरही घसरल्याने सुमारे 6 टन फिशमील समुद्रात टाकून देण्याची नामुष्की मच्छीमारांवर ओढावल़ी इतर मासळी बरोबरच फिशमील मच्छीमारांना तारणारे ठरत़े मात्र त्यानेही दगा दिल्याने मच्छिमारांमध्ये निराशा आहे.
मच्छीमारांना मासेमारी करताना काही वेळा लहान आकाराची मासळी मिळत़े ही मासळी विक्री योग्य नसत़े ही टाकाऊ मासळी फिशमील म्हणून कंपन्यांना पाठवण्यात येत़े याचा वापर प्रामुख्याने खत बनवण्यासाठी होत़े समुद्रात सापडलेल्या फिशमिलवर प्रक्रीया करुन मुंबई, मंगलोर, केरळ, गोवा आदी राज्यात पाठवले जाते. त्यामुळे खतनिर्मिती कंपन्यांकडून फिशमीलला मोठय़ा प्रमाणात मागणी असत़े काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे किनारपट्टीवर सुकवून ठेवण्यात आलेल्या मासळीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े आता फिशमीलचा दरही घसरल्यामुळे पारंपरीक मच्छीमार हताश झाला आह़े