दापोली / प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ हळूहळू अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे. दापोली तालुक्यातील केळशी किनाऱ्यावरून ते पुढे समुद्रात जाण्याची शक्यता असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धडाका काल पासून सुरूचआहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर ते बावनदी दरम्यान चार ठिकाणी दरड कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे यामुळे काही ठिकाणी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे शास्त्री नदीला पूर आल्याने शेतात कापून ठरवलेले भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तसेच राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा असे देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे