ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
केरळ सरकारने नागरिकांनी बकरी ईद साजरी करता यावी यासाठी कोरोना निर्बंध शिथिल केले होते. या निर्णयाविरोधात दिल्ली येथील नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचिकेवर आज दिनांक 20 जुलै रोजी सुनावणी पार पडली. यात बकरी ईदसाठी निर्बंध शिथिल करण्याची विनंती नाकारत केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
या सुनावणी वेळी केरळ सरकारने नागरिकांच्या दबावाचा विचार करत आपण ही शिथीलता दिली होती, असे स्पष्टीकण न्यायालयाला दिले, मात्र न्यायालयाने केरळ सरकारला कावड यात्रेसंबंधी दिलेल्या आदेशाचं उदाहरण देत बकरी ईदलाही या नियमांचं पालन करण्याचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन आणि बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
कावड यात्रा प्रकरणात आम्ही दिलेल्या आदेशाचं पालन केलं जावं असा आदेश आम्ही केरळ सरकारला देत असल्याचं यावेळी खंडपीठाने स्पष्ट केले. यावेळी कोर्टाने म्हटलं की,“कोणत्याही प्रकारचा दबाव लोकांचा जगण्याचा सर्वात मोठा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. कोणतीही अनुचित घटना घडली तर जनता आमच्या लक्षात आणू शकते आणि त्यानुसार कारवाई केली जाईल” असे ही न्यायालयाने या सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहे.