प्रतिनिधी / खानापूर
सकाळच्यावेळी खानापूरहून उद्यमबागला नोकरी व्यवसायासाठी तसेच महाविद्यालयाला जाणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. पण अपुऱया बससेवेमुळे विशेषतः सकाळी 7 ते 9.30 या वेळेत राजा शिवछत्रपती चौकातील जुन्या स्थानकावर व जांबोटी क्रॉसवरील बसस्थानकावर मोठी गर्दी होते. यामुळे बेळगावला वेळेत पोहोचता येत नाही. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही परिवहन खात्याकडून याची दखल घेतली जात नाही. यामुळे तालुक्यातील भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी आपल्या काही सहकाऱयांसह मंगळवारी सकाळी बस आगाराला भेट दिली. त्यावेळी बसस्थानकावर बरीच गर्दी होती. यामुळे त्यांनी तातडीने बस आगार प्रमुखांशी संपर्क साधला. काही वेळात बस आगार उपप्रमुख त्या ठिकाणी हजर झाले. त्यावेळी पंडित ओगले यांनी बससेवा उपलब्ध करा, अन्यथा आगाराचे गेट बंद करू, असा इशारा दिला.
त्यावेळी आगार उपप्रमुखांनी तात्काळ दोन बसेसची सोय केली. यामुळे बसस्थानकावर झालेल्या गर्दीवर आवर घालता आला. या पुढे सकाळच्या वेळी खानापूर-बेळगाव मार्गावर आवश्यक तितक्या बससेवा सुरू करा, अन्यथा या पुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी आगार उपप्रमुख महेश तिरकन्नावर यांना दिला. त्यावर आगार उपप्रमुखांनी खानापूर आगारात कर्मचाऱयांची संख्या कमी असल्याने बससेवा सोडण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर पंडित ओगले यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती द्यावी, आम्ही परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन कर्मचाऱयांची संख्या वाढवून देण्याची मागणी करू, तरी कुठल्याही परिस्थितीत यापुढे सकाळच्या वेळेत बेळगावला जाणाऱया प्रवाशांची तसेच महाविद्यालयाला जाणाऱया विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही, याची काळची घ्या, अशी समज दिली. यावेळी ओगले यांच्यासमवेत किरण तुडयेकर, राज गावडे, रघुनाथ गुरव तसेच विद्यार्थीवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.