शॉकसर्किटने लागली आग: शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी
बोरगाव / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील बहे फार्णेवाडी शिवेवर असणाऱ्या जाधव मळी परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १० एकर ऊस जळून खाक झाला ही आग मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान लागली. बहे, फार्णेवाडी शिवाराच्या ऊस क्षेत्रावरून एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलकडे जाणारी महावितरणची विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत.
या वाहिन्याच्या मध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीतून आगीला सुरुवात झाली. दुपारचे कडाक्याचे ऊन व वारा यामुळे या आगीने रुद्र रूप धारण केले या आगीत अरुण जनार्दन जाधव, श्रीकांत जयकर जाधव, प्रकाश धोंडीराम जाधव, इंदुमती लक्ष्मण जाधव, संजय लक्ष्मण जाधव, कमल शंकर जाधव, शंकर रामचंद्र जाधव, आनंदा कृष्णा मुळीक, विनायक वसंत मुळीक, शिवाजी बापू मुळीक या शेतकऱ्यांचा १० एकर हुन अधिक ऊस जळाला आहे.
या परिसरात शेकडोच्या संख्येने शेतकरी जमा झाले होते या शेकऱ्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या परिसरात असणारे ऊसाचे बहुतांशी क्षेत्राचा आगीपासून बचाव झाला. जळीत ग्रस्त शेतकऱ्यांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.