बेंगळूर/प्रतिनिधी
बीबीएमपीने कर्नाटकच्या उच्च न्यायालयात माहिती देताना, मास्क न वापरणाऱ्या आणि सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांकडून दंड म्हणून गेल्या चार महिन्यांत सुमारे तीन कोटी रुपयांची वसूल केल्याचे म्हंटले आहे.
मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गुरुवारी जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान दाखल करण्यात आलेल्या मेमोमध्ये ही माहिती बीबीएमपीने दिली.
९ जून ते ६ ऑक्टोबर, २०२० दरम्यान सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३१.५ लाख तर १.२५ लाख लोकांकडून मास्क न वापरल्याबद्दल बीबीएमपीने २.६५ कोटी रुपये दंड आकारला आहे. तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे १७० आस्थापनांवर कारवाई केली असल्याचे बीबीएमपीने कोर्टाला सांगितले.
बीबीएमपीने न्यायालयात मास्क घालून सामाजिक अंतर राखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली.