आपली एखादी वस्तू हरवली, सापडत नाही? आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही? व्यवस्थित ठेवले आहे हे अंधूक आठवत असते, पण सापडत नाही. अशा वेळी एखादी सर्च टेक्नॉलॉजी म्हणजे गुगलने किंवा कोणीतरी शोधून द्यावी असे वाटते. मात्र येणाऱया काळामध्ये हे शक्मय आहे ह्यावर आपला विश्वास बसेल? खरंच हे शक्मय आहे. मग कसं शक्मय आहे हे…..
तर आज आपण ज्याला ‘इंटरनेट’ म्हणतो, म्हणजे संगणक एकमेकांना विशिष्ट पध्दतीने जोडून निर्माण झालेले एक जाळं. संगणक, स्मार्टफोन, टॅबलेट यांसारख्या असंख्य साधनांनी आपण इंटरनेटशी जोडले गेलो आहोत. आपण आपल्या आयुष्यात अनेक वस्तू वापरत असतो. उदाहरण द्यायचे तर अलार्म, पाणी तापवण्याचे गिझर, फ्रिज, विजेचे दिवे, मोटारसायकल, कार आणि इतर अनेक हजारो गोष्टी. जर माणसांप्रमाणेच उद्या या वस्तूही इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडल्या गेल्या, संवाद साधू लागल्या आणि त्यानुसार काम करू लागल्या तर? म्हणजे ह्या वस्तूंना एकमेकांना इंटरनेटच्या माध्यमाने जोडून वापरणे, या संकल्पनेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (Internet Of Things – IoT) असे म्हणतात.
‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मध्ये वस्तू आहेत तशा म्हणजे सध्याच्या स्वरुपामध्ये वापरता येत नाहीत. त्या वस्तूंना ‘स्मार्ट’ बनवावं लागतं. या स्मार्ट वस्तूंमध्ये बसवलेल्या सेन्सर्समार्फत आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती गोळा केली जाते व त्याचे विश्लेषण करुन ती माहिती वापरली जाते. उदाहरणार्थ, आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोनमध्ये कितीतरी सेन्सर्स आहेत. ह्या सेंसरमुळे आपण कुठे आहोत हे समजते- GPS; फोन सरळ आहे, आडवा आहे की उलटा, हे समजते (Accelerometer); वेग किती आहे, हे समजते (Pedometer); याबरोबर दिशादर्शक, बारकोड वाचणारे, हृदयाचे ठोके मोजणारे असे अनेक सेन्सर्स आहेत. यामुळे आज आपण अनेक गोष्टींसाठी हा स्मार्टफोन वापरू शकतो.
अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मधल्या वस्तू नुसत्या स्मार्ट बनवून चालत नाही तर त्यापुढे जाऊन इंटरनेटद्वारे इतर गोष्टींशी संवाद करण्याची क्षमता असणे आवश्यक असते हा संवाद दोन्ही बाजूने असावा लागतो. म्हणजेच या वस्तूंनी जमा केलेली माहिती इंटरनेटद्वारे दुसऱया वस्तू किंवा व्यक्तीपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तसेच इतर वस्तूंकडून आलेल्या माहितीनुसार त्यावर प्रोसेस करुन कृती, काम करणंही जमलं
पाहिजे.
आपल्या दैनंदिन आयुष्यात तसेच इंडस्ट्री विश्वात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चे खूप महत्व व उपयोग आहेत आणि ते वाढत जाणार आहेत. फिटनेस बँड, स्मार्ट वॉच ही याचीच काही उदाहरणे म्हणता येतील. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ मध्ये स्मार्ट होम्स तयार केली गेली आहेत. यामध्ये येणाऱया घरातल्या सर्व सोयीसुविधा जसे की- तुम्ही उठण्यापूर्वीच सुरू झालेला गिझर, संध्याकाळ होताच स्वतःहून लागणारे दिवे, घराबाहेर पडताच दरवाजे लॉक होणे इ. म्हणजे अगदी थट्टेत सांगायचे तर पुलंनी एका कथेमध्ये केलेले वर्णन नको असलेले पाहुणे आले की दाराशीच त्यांना एक कुत्रा चावतो, हेही ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मुळे होऊ शकतं! गमतीचा भाग सोडला, तर ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा वापर हा अमर्याद आहे हो माणसाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. जेवढी नविन कल्पना तेवढी शक्मयता. त्यामुळेच पुढे येणाऱया काळात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ माणसाचे संपूर्ण जीवनच बदलणार आहे हे नक्की.
इंडस्ट्री विश्वात तर याचे प्रचंड फायदे आहेत. Fourth Industrial Revolution किंवा इंडस्ट्री 4.0 मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ हा एक महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. इंडस्ट्रीची कार्यक्षमता वाढवून, प्रोडक्शन कॉस्ट कमी करुन ग्राहकांना उत्तम वस्तू व सेवा पुरवणे यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा उपयोग होतो आहे. याचे एक उदाहरण म्हणजे समजा तुमच्या गाडीमध्ये एक सेन्सर बसवला. ह्या सेन्सरचे काम असेल की तुमच्या गाडीची माहिती गोळा करून इंटरनेटद्वारे त्या गाडीच्या कंपनीला पाठवणे. कंपनी या माहितीचे विश्लेषण करून तुमच्या गाडीमध्ये काही समस्या आहे का, किंवा येणाऱया काळात निर्माण होण्याची शक्मयता आहे का, हे पडताळू शकेल व त्यानुसार तुम्हाला ग्राहकांना कळवू शकेल. समजा जर असे काही आढळले तर व ते सर्व गाडय़ामध्ये असेल तर कंपनी त्यांच्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करून सगळय़ांसाठीच उपाययोजना करू शकेल.
‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मध्ये वेगवेगळय़ा माहितीची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होत राहते आणि अशा अनेक वस्तू या येणाऱया माहितीच्या आधारे काम करतात. यामुळे इंटरनेटवरचे जे धोके असतात, ते इथेही लागू पडतात. सुरक्षितता आणि गोपनीयता हा निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे आणि भविष्यकाळात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ किती वेगाने वाढेल, हे सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे. नवीन तंत्रज्ञान, त्यामुळे निर्माण होत असलेल्या नवीन शक्मयता आणि समस्या, त्याची तंत्रज्ञानानंच शोधलेली नवीन उत्तरं हा नावीन्याचा आणि नवनिर्मितीचा खेळ तर चालूच राहणार आहे. तंत्रज्ञानामुळे होणारे बदल समजावून घेणे आणि योग्य वेळी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्याला करता आलं पाहिजे.
तसे पाहिले गेले तर आजच्या गतिमान जीवनशैलीमुळे माहितीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. मानवाच्या जीवनातील समाविष्ट व आवश्यक त्या भौतिक वस्तू ह्यांच्या बरोबर सुसंवाद अव्याहत्पणे चालू असणे गरजेचे झाले आहे. एखादे यंत्र तयार करण्यासाठीचे संशोधन, केल्यावर त्याच्या पूर्वचाचण्या, पडताळणी यासाठी लागणारा वेळ न घालवता भविष्यातील वस्तू, यंत्रांना परिस्थितीनुसार निर्णय क्षमता आली तर त्याचे काम अधिक अचूक होईल. आज संशोधक विविध वस्तू अगदी पेन्सिल, पीन, दात घासायचा ब्रश पासून ते सॅटेलाईट तंत्रज्ञानापर्यंत ह्या इंटरनेट एनेबल कसे करता येईल यावर काम करण्यात मग्न आहेत. ही सर्व उपकरणे स्मार्ट फोनवर नियंत्रित करता येतील यावरही भर दिला जात आहे.
मग विचार असा येतो की जर ह्या वस्तू इंटरनेट एनेबल झाल्या तर याची गोपनीयता व सुरक्षा राहील का? प्रत्येक व्यक्तीची माहिती जी ह्या उपकरणांना दिली जात आहे ती सुरक्षित राहील का? याचे उत्तर “हो’’ असे देणे थोडे कठीण आहे. मात्र प्रत्येक कंपनी सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्याच प्रमाणे इंटरनेटची पायाभूत रचना व त्याची सुरक्षितता कशी वाढवता येईल याकडे ही लक्ष दिले जात आहे. भारताच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपले इंन्फ्रास्टचर कसे चांगले होईल याकरीता सरकार मोठी गुंतवणूक करत आहे.
सामान्य व्यक्ती ह्या आय.ओ.टी. पासून लांब राहू शकणार नाही. त्याला आपल्या आयुष्यामध्ये ह्या आय.ओ.टी चा अंतर्भाव करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. जर असे असेल तर कोणती सुरक्षा बाळगावी, आय.ओ.टी उपकरणे कशी हाताळावीत, ह्यामधून सायबर क्राईम कसा होतो व तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ह्या बद्दल पुढील लेखामध्ये सांगेन.
-विनायक राजाध्यक्ष, सांगली