प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात होणारी वाहतूक कोंडीमुळे पोलिस तसेच मनपाने कोंडी सोडविण्यासाठी रस्त्याशेजारी भाजी विक्री करणाऱया विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. शुक्रवारी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर शनिवारी मनपाने काकतीवेस व शनिवार खुंट येथील विपेत्यांवर कारवाई केली. विक्रेत्यांकडून भाजी देखील जप्त करण्यात आली आहे. यामुळे या विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजी व फळे विक्रेत्यांवरची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी विपेत्यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱयांकडे केली.
मागील 20 ते 30 वर्षांपासून भाजी व फळे विक्री करण्याचा व्यवसाय करीत आहे. हेच उदयनिर्वाहाचा माध्यम आहे. आधीच लॉकडाऊनमुळे पाच महिने व्यवसाय नव्हता. आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येत असाताना कारवाई करण्यात येत असल्यामुळे पोट कसे भरायचे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
शनिवार खुंट, काकतीवेस, गणपत गल्ली, मारूती गल्ली, समादेवी गल्ली परिसरातील 100 ते 150 विपेते यावेळी उपस्थित होते.