प्रतिनिधी / खानापूर
तालुक्मयात भात गंजीना आग लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, अनेक शेतकऱयांच्या भात गंजी जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. वाढत्या भात गंजीच्या आगीने शेतकरी चिंतातूर बनले आहेत. कृषी खात्याने दखल घेण्याबरोबर पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची गरज क्यक्त होत आहे.
तालुक्मयात सुगी हंगामाला जोर आला असून भात कापणी, भात जमा करणे, भाताची गंजी घालणे, मळणी आदी कामात शेतकरी मग्न असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. मात्र शेतकऱयांनी भात कापणी करून घातलेल्या गवत गंजीना आग लागण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकऱयांतून चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या आठवडय़ाभरात घातलेल्या भात गंजींना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये शेतकऱयांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे. समाजातील काही वाईट प्रवृत्तीचे लोक अशाप्रकारची कृत्ये करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी यांच्यावर लक्ष ठेवावे अशी मागणी होत आहे.
शेतकऱयांच्या चिंतेत वाढ
वर्षभर काबाडकष्ट करून जमा केलेल्या भात गंजींना आग लागत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ऐन सुगी हंगामात अशाप्रकारच्या घटनांना ऊत आल्याने भाताची नासाडी होताना दिसत आहे. आगीत धान्याबरोबर गवताचे (पिंजर) नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांचा चाऱयाचा प्रश्न गंभीर बनत आहे. भात मळणी करण्यासाठी एकत्रित करुन ठेवलेल्या भात गंजीना लाग लावण्यात येत असल्याने भाताबरोबर सुक्या चाऱयाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
सुक्या चाऱयाचाही प्रश्न गंभीर सध्या सुगी हंगामात शेतकरी मग्न झाले आहे. सगळीकडे एकदम सुगी सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्याबरोबर कापणी झालेल्या शिवारातील ओलावा कमी होऊ नये यासाठी भात कापणी झालेले भात गवत गंजी घालून ठेवत आहेत. व शेतकरी रब्बी हंगामातील कडधान्यांची पेरणी करत आहेत. मात्र जमा करून ठेवलेल्या भात गंजी आगीत भस्मसात होत असल्याने नुकसान झालेल्या शेतकऱयांसमोर धान्यांचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. घरी घेऊन जायच्या आधीच भात शिवारातच जळत असल्याने शेतकरी चिंतातूर बनले आहेत.