कुत्र्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ : बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात भटक्मया कुत्र्यांपासूनची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात मनपा अपयशी ठरताना दिसत आहे. भटक्मया कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. शहरात शेकडोने भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मनपाचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्यांचे नागरी वस्तीतील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात रस्त्यावर सर्रास लावले जाणारे चायनीजचे स्टॉल्स तसेच हॉटेलमधील अन्नपदार्थ रस्त्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी अनेक भटक्या कुत्र्यांचे कळप एकत्रित येतात. रात्रीच्यावेळी मोकळय़ा मैदानात, खुल्या जागेत, कचरा कुंडय़ांवर या कुत्र्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे सकाळच्या व रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणाऱया नागरिकांना भीतीखाली वावरावे लागत आहे.
भटक्मया कुत्र्यांनी रस्त्यावरुन जाणाऱया नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत त्यामुळे या भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. एकीकडे शहराची स्मार्टसिटीच्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे मात्र भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे मनपाने कुत्र्यांना पकडण्याची मोहीम गतिमान करावी, अशी मागणी होत आहे.
हॉटेल, कचरा कुंडय़ा व मुख्य रस्त्यावर कुत्र्याची दहशत वाढली आहे. परिणामी लहान बालकांना भीतीच्या छायेखालीच घराबाहेर पडावे लागत आहे. वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच कुत्री ठाण मांडून बसत असल्याने वाहनधारकांना भीतीच्या छायेखालीच वाहने चालवावी लागत आहेत. काही वेळा तर ही कुत्री पादचारी व वाहनधारकांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने बंदोबस्त करावा.