नवी दिल्ली : भारत व लंका यांच्यात होणारी मर्यादित षटकांची मालिका कोव्हिड 19 महामारीमुळे रद्द करण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. या मालिकेसाठी ही योग्य वेळ नसल्याचे दोन्ही मंडळांनी स्पष्ट केले.
एफटीपीनुसार जून-जुलै महिन्यात भारतीय संघ लंका दौऱयावर जाण्याचे ठरले होते. त्यात 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळविले जाणार होते. ‘सध्याच्या स्थितीत भारतीय संघ लंका दौऱयावर जाणे योग्य ठरणार नाही,’ असे सूत्राने सांगितले. लंकन मंडळाने पत्रकाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘कोव्हिड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट मालिका खेळणे शक्य होणार नाही, असे बीसीसीआयने लंका क्रिकेटला कळविले आहे,’ असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.