ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारत सरकारकडून चीनच्या 59 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतीय सैन्य दलाने जवानांना स्मार्टफोन मधून 89 ॲप्स 15 जुलैपूर्वी डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलाने चीनला मदत करणाऱ्या अमेरिकेच्या ॲप्स विरोधात मोहीम उघडली आहे. तसेच ही ॲप्स माहिती चोरत असल्याचा आक्षेप घेत, संबंधित ॲप्स डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले आहेत. यामध्ये फेसबुक, टिंडर, इंस्टाग्राम, ट्रू कॉलर सारख्या एकूण 89 ॲप्सचा समावेश आहे.
यामध्ये डेलीहंट हे न्यूज ॲप, पब्जी सारखे गेमिंग ॲप, झूम, ब्युटी प्लसचा देखील यामध्ये समावेश आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.