नवी दिल्ली : मागील आठवडय़ात पेटीएम आणि गुगल यांच्यात वाद झाल्यानंतर फिनटेक कंपन्यांवर मोठय़ा प्रमाणात तेजीला प्रारंभ झाल्याचे दिसून आले. पेटीएमकडून गुगलवर वेगवेगळय़ा स्वरुपाचे आरोप लावण्यात आले. गुगल भारताची डिजिटल इकोसिस्टमवर वर्चस्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. कारण भारतामधील फिनटेक क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग हा अन्य देशांच्या बरोबरीत तेजीने वाढत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 2019 च्या चौथ्या तिमाहीत फिनटेक गुंतवणूक 1.47 लाख कोटीवर पोहोचला आहे. सदरच्या क्षेत्राला कोरोना महामारीचाही आधार मिळालेला आहे. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जातो. ब्लूमबर्गच्या प्राप्त अहवालानुसार भारतात कोरोनाच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. परंतु याच दरम्यान फिनटेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक तेजीने वाढत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. यात जून 2020 पर्यंत फिनटेक गुंतवणूक मागील वर्षाच्या तुलनेत 12.52 हजार कोटी रुपये जमा झाले असून हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. 2019 च्या चौथ्या तिमाहीत पेटीएमला 10.31 हजार कोटीची गुंतवणूक मिळाली होती.
Previous Articleकोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे घटले
Next Article चिंता व निद्रा एकत्र नांदत नाहीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.