परस्परांशी संवाद साधला तरच भाषा सदृढ : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अनिल आजगावकर यांचे परखड मत
प्रतिनिधी / बेळगाव
भाषेचे दमन करणारी एक दमन यंत्रणा कार्यरत असते. मात्र दमन यंत्रणांच्या विरोधात भाषा टिकविण्याची जिद्द अधिक प्रभावी होते. त्यामुळे जल्लोष होऊन भाषा टिकते. आजपर्यंत बेळगाव सीमाभागामध्ये भाषेचे दमन होत असताना महाराष्ट्रातील अनेक ज्ये÷ साहित्यिक, नाटककार, कथाकार, समिक्षक सीमाभागातील साहित्य संमेलनाला येत असतात. त्या संमेलनामध्ये साहित्याची देवाण-घेवाण होते. तसेच परस्परांशी संवाद होऊन भाषा सदृढ होत असल्याचे परखड मत पत्रकार अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने आयोजित केलेल्या 16 व्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी अध्यक्षीय भाषणात हे मत व्यक्त केले. दिवंगत वाय. बी. चौगुले संमेलन नगरीतील नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. एकमेकांशी आम्ही मातृभाषेतून संवाद साधतो. त्यामुळेच भाषा प्रभावी होते. साहित्याचे वाचनही महत्त्वाचे आहे. कारण वाचन अधिक झाल्यानंतर आपण संवाद साधून भाषा प्रभावित करत असतो. त्यामुळे भाषाही समृद्ध होत जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
व्यक्तीचा विकास हा साहित्याच्या वाचनातूनच होत असतो. तेव्हा साहित्य वाचन अनिवार्य आहे. साहित्यातून मिळणारी भाषा ही जिवंत राहते. त्यासाठी साहित्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत आता 21 व्या शतकामध्ये मात्र शहरी भागातून भाषा कमी होत चालली आहे. ग्रामीण भागातच साहित्याचे जतन होत आहे. तसेच बोलीभाषा टिकून आहे. त्यामुळे साहित्याला जतन करण्याचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भागात असल्याचे अनिल आजगावकर यांनी सांगितले.
साहित्याची मोठी किमया
साहित्याची मोठी किमया आहे. कारण साहित्यातून क्रांती झाली आहे. 1917 साली साहित्यामुळेच रशियाची क्रांती झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते. त्यानंतर व्यक्तीचा विकास होतो. साहित्य ही सामाजिक बाब आहे. देशाच्याबाबतही साहित्यामुळेच क्रांती घडली आहे. महात्मा गांधीजींनी रक्सिन यांचे साहित्याचे पुस्तक वाचले. आणि गांधीजींचे चरित्रच बदलले. तेव्हा देशाची क्रांती, सामाजिक क्रांती होण्यासाठी साहित्याचे वाचन करणे महत्त्वाचे आहे.
सध्या लॅपटॉप, मोबाईलसारख्या प्रभावी वस्तूंमुळे भाषेचे महत्त्व कमी होत चालले आहे. यामुळे अनेकजण भावना व्यक्त करत नाहीत. त्यामुळे भाषा समृद्ध होत नाही, असे सांगत सध्या स्मार्ट युगात लोकांचा संपर्क हा इंटरनेटच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होताना दिसत नाही. सध्याच्या या धावत्या युगात या आधुनिक तंत्रांचा वापर होत असला तरी एकमेकांशी संवाद साधल्यानंतर साहित्य संस्कारक्षम्य आणि प्रभावी होते. तेव्हा आधुनिक तंत्रांचा वापर करताना साहित्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात संमेलने साहित्याच्या हिताची गोष्ट…
सध्या सांप्रत काळ सुरू आहे. कारण कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कोरोनामुळे समारंभांवर मर्यादा येत आहेत. असे असले तरी बेळगावच्या पंचक्रोशीत ग्रामीण साहित्य संमेलने भरविली जात आहेत. ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी कोरोनाचे नियम पाळत साहित्य संमेलने होत आहेत. ही बाब साहित्याच्यादृष्टीने हिताची असल्याचे त्यांनी सांगितले.
हास्यकल्लोळने साहित्य संमेलनात रंगत भरली
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाश काशिद यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विडंबन सादर करून साहित्य संमेलनामध्ये रंगत भरली. सामाजिक काम करत असताना कशाप्रकारे विडंबन तयार होते. ‘झलक एक टीव्हीची’ या विषयावर त्यांनी हा कार्यक्रम सादर केला. राजकीय व्यक्तींची चालबाज त्यांनी या विडंबनातून सादर केली. यामुळे हास्याची फवारणी या साहित्य संमेलनामध्ये झाली.
या विडंबनावर चिंतन केल्यास निश्चितच प्रबोधन होते. त्यासाठी फक्त हास्याकडे न पाहता त्यामधून प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अशा एकूण 27 पात्रांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम सादर केला. ‘झलक एक टीव्हीची’ या विषयावर त्यांनी साऱयांनाच हास्यामध्ये खिळवून ठेवले. टीव्हीवर सादर होणारे कार्यक्रम त्यावरून विडंबन करून सर्वांना त्यांनी हसविले.
यावषी कोरोना असल्यामुळे येळ्ळूरचे साहित्य संमेलन नेताजी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित करण्यात आले होते. या हास्यकल्लोळचा आनंद साऱयांनीच लुटला. प्रकाश काशिद यांनी टीव्हीवर होणाऱया कार्यक्रमांचे विडंबन केले. आठवडाभर असलेल्या टीव्हीचा कार्यक्रम सांगताना कशाप्रकारे विडंबन होते, हे त्यांनी दाखवून दिले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी साहित्यप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.