सातारा / प्रतिनिधी :
जिथं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसायचा. फक्त वर्ण व्यवस्थेत वरचा वर्ग म्हणजेच सर्वकाही. बाकीचे तीन वर्ग म्हणजेच गुलाम. सगळ्यात खालचा वर्ण म्हणजे शुद्र. हा तर गुलामच. गुलाम अशाप्रकारे मनुष्य उतरंडीमध्ये पिचलेला. जो पिचलेला माणूस होता. त्या माणसाने समानतेसाठी, सन्मानाच्या भूमिकेसाठी आणि माणसाला माणसासारखं वागण्यासाठी केलेलं बंड म्हणजेच भीमाकोरेगाव लढाई. ती लढाई नसून ते समता प्रस्थापित केलेले युद्ध होतं, असे मत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टीच्यावतीने भीमा-कोरेगाव शौर्य स्तंभाची प्रतिकृती प्रतापसिंहनगर येथे करण्यात आली होती. मानवंदना देण्यात आली. यावेळेस सर्व आंबेडकर प्रेमी व रिपब्लिकन पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओव्हाळ म्हणाले, पेशवाईच्या काळामध्ये शूद्रांना म्हणजेच खालच्या वर्णातील लोकांना गुलामाचे गुलाम होऊन जी वागणूक असायची. ती पशुपेक्षा ही हिन होती. मानवनिर्मित असणारे सर्व अधिकार नाकारण्यात आले होते. ते अधिकार नाकारून फक्त आणि फक्त अमानवीय अशी वागणूक असंख्य जातींना दिली होती. त्यामध्ये पेटून उटलेल्या काही तरुणांनी इंग्रजांच्या सैन्यात मानव मुक्तीसाठी लढून इंग्रजांच्या बाजूने लढून माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्या, या मागणीसाठी ज्या पद्धतीने तुम्ही पशूंना सुद्धा चांगली वागणूक देता. त्या पद्धतीने समतेची वागणूक मिळावी. म्हणून त्या 500 शुरांनी केलेलं बंड म्हणजेच भीमा कोरेगावचा महासंग्राम होय. याच शौर्यदिन निमित्त त्या पूर्वजांना विनम्र मानवंदना प्रत्येक शोषित वंचित समाजातील घटकांनी दिला पाहिजे आणि पूर्वीचा इतिहास न विसरता इतिहास वाचला तरच मानवजात वाचणार आहे, असे त्यांनी सांगितले.