ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील शाळा आणि कॉलेज सध्या बंद आहेत. अशा परिस्थितीतही मध्य प्रदेेशातील शिवराज सरकार विद्यार्थ्यांच्या खाण्या पिण्याची काळजी घेत आहेे. म्हणजेच सरकारने खाद्य सुरक्षा भत्ता म्हणून विद्यार्थ्याच्या खात्यात 137.66 कोटी रुपये भरले आहेत.
काल शिवराज सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या 56 लाख 80 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात खाद्य सुरक्षा भत्ता म्हणून 137 कोटी 66 लाख रुपये भरले आहेत. तर दुपारचे जेवण बनवणाऱ्या 2 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी 42 कोटी रुपये भरले आहेत.