प्रतिनिधी / मिरज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा, मिशन हॉस्पिटल चौक येथे बुधवारी निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘मजुरांना मदत करणे हा जर गुन्हा असेल, तर हो, काँग्रेसने तो गुन्हा केलाय’, ‘महाराष्ट्र द्रोही भाजप, महाराष्ट्र द्रोही मोदी’, ‘नमस्ते ट्रम्प, करणारे मोदीच खरे कोरोना स्प्रेडर’, ‘शर्म करो मोदीजी’ अशा घोषणा त्यांनी दिल्या.