तरुण भारत ऑनलाइन टीम
कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून देशातलं वातावरण तापलं आहे. कर्नाटकमध्ये सरकारी महाविदयालयाने मुस्लीम मुलींना हिजाब किंवा बुरखा घालून महाविद्यालयात प्रवेश नाकारला आहे. यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत .यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणावरून आपली भूमिका मांडली आहे संसदेत डोक्यावर पदर घेऊन येणाऱ्या महिला खासदारांना तुम्ही पदर खाली घ्यायला सांगणार आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे.
अनेक मुली हिजाब न घालता कॉलेजमध्ये जात आहेत. अनेक मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये जात आहेत. पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही यासंदर्भात कायदा कसा आणणार? असंही ते पुढे म्हणाले आहेत.तसेच भारतासारख्या लोकशाही देशात. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून म्हटलं होतं की आमच्या सरकारचं एक ध्येय आहे ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि विविधता. आता स्वातंत्र्य आणि समता असती, तर तुम्ही त्या मुलींना कॉलेजच्या बाहेर केलं नसतं”, असं जलील म्हणाले आहेत.