प्रतिनिधी / फलटण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणानुसार केंद्रीय जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वपूर्ण योजना देशभर वेगात सुरु आहे. केंद्र शासनाच्या या योजनेनुसार सन 2024 सालापर्यंत देशातील प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी देऊन स्वच्छ व भरपूर पाणी उपलब्ध करुन देण्याचे केंद्र सरकारचे महत्वपूर्ण धोरण आहे. ही योजना केंद्र शासनाची असून निधीही केंद्राचा मिळणार आहे. मात्र अंमलबजावणी व कामाची पूर्तता राज्य सरकार व जिल्हापरिषदांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत फलटण- कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील 71 गांवाचा समावेश आहे. या कामांसाठी लागणारा सुमारे 50 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघातील फलटण तालुक्यातील 65 गावांचा व कोरेगाव तालुक्यातील 6 गावांचा अशा एकूण 71 गावांचा समावेश आहे. यामध्ये मानेवाडी, शेरेचीवाडी (ढवळ), वेळोशी व वाघोशी 24.70 लक्ष अशा चार गावासाठी एकूण 99 लक्ष 17 हजार निधी मंजूर असून तिथली कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. खडकी, आदर्की बु., आळजापूर, बरड, बिबी, दऱ्याचीवाडी, दुधेबाबी, गोखळी , हणमंतवाडी, जाधववाडी(त), जावली, कांबळेश्वर, काशीदवाडी, खटकेवस्ती, कोळकी, माळेवाडी, माझेरी, मिरढे, मुरूम, परहर (बु ), परह ए (खु), पवारवाडी, राजूरी, रावडी, साखरवाडी, सांगवी, साठे, शिंदेनगर, तडवळे, टाकळवाडे, टाकूबाईचीवाडी, ताथवडा, विठ्ठलवाडी अशा एकूण 33 गावांसाठी एकूण 20 कोटी 19 लक्ष 78 हजार रुपये निधी मंजूर करुन घेतला असून या गावांची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
ढवळ, घाडगेवाडी, हिंगणगाव, कापशी, नांदल, सासवड, सोनवडी खु, वाखरी, झडकबाईचीवाडी या 9 गावांसाठी एकूण 6 कोटी 97 लक्ष 20 हजार निधी मंजूर असून कामाची तांत्रिक मंजूरीही मिळाली आहे.
आसू, चांभारवाडी, फडतरवाडी, घाडगेवाडी, गिरवी, गुणवरे, कुरवली बु, कुसूर, मठाचीवाडी, मिरगाव, मुळीकवाडी, मुंजवडी, पाडेगाव, सालपे, सावंतवाडी, सुरवडी, तांबवे, वडले, व वडजल या 19 गावांसाठी एकत्रित 18 कोटी 46 लक्ष 41 हजार रुपये निधी अंदाजपत्रक मंजूरीस सादर केला आहे.
कोरेगाव उत्तरमधील 6 गावांचाही या योजनेत समावेश
अनपटवाडी 68.84 लक्ष, फडतरवाडी 30.39 लक्ष, जाधववाडी 53.76 लक्ष, नायगाव 24. 99 लक्ष, पिंपोडे 199 लक्ष व राऊतवाडी 52.25 लक्ष असा एकूण 6 गावांसाठी 4 कोटी 29 लक्ष 23 हजार रुपये निधी मंजूरीस सादर केला आहे.