फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या रश्मी पडेलकर यांचे प्रतिपादन
ओटवणे / प्रतिनिधी:
डॉ. बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले पण हे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येण्यासाठी धम्म चळवळ गतिमान करणे आवश्यक आहे. चळवळीला गतिमान करण्यासाठी महिला सक्रिय झाल्या तरच बौद्ध चळवळ निश्चितच गतिमान होईल असा आशावाद फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सौ. रश्मी दीपक पडेलकर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेमार्फत आयोजित करण्यात वर्षावास कार्यक्रमात प्रवचनकार म्हणून रश्मी दीपक पडेलकर
बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सुनील जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणाभुमीचे अध्यक्ष डी. के. पडेलकर, केंद्रप्रमुख अनंत कदम, मोहन जाधव, वासुदेव जाधव, भावना कदम, ममता जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सुनील जाधव, हार्दिक पडेलकर, अनंत कदम, डी. के. पडेलकर यांनीही मार्गदर्शन केले.