प्रतिनिधी / सातारा
महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याना आदरणीय पवार साहेबानी गेल्या वर्षी जंबो कोव्हिडं सेंटर उभं करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण महाराष्ट्रमधील एकही साखर कारखान्याने उभा केला नाही दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांनी आता सांगितले की ऑक्सिजन प्लँट उभा करा. आता ऑक्सिजन प्लँट उभा करणार कधी तो देणार कधी, माणसांचा ऑक्सिजन संपल्यावर तुमचा ऑक्सिजन येणार आहे, असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांना केला.
साताऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे उपस्थित होते. सदाभाऊ म्हणाले,महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याना आदरणीय पवार साहेबानी गेल्या वर्षी जंबो कोव्हिडं सेंटर उभं करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण महाराष्ट्रमधील एकही साखर कारखान्याने उभा केला नाही दुसऱ्या बाजूला पवारयांनी आता सांगितले की ऑक्सिजन प्लँट उभा करा.
म्हणजे लबाडाच जेवण जेवल्याशिवाय खर नसत, राज्यात तहान लागल्यावर आड काढायचा उद्योग चालला आहे. आता ऑक्सिजन प्लँट उभा करणार कधी तो देणार कधी, एकतर कारखाना उभा करणारच नाही पण माणसांचा ऑक्सिजन संपल्यावर तुमचा ऑक्सिजन येणार आहे. त्यामुळे तुम्ही मुद्द्याला ऑक्सिजन देणार आहे का हा ही एक प्रश्न आहे. गेल्या सात आठ महिन्यात खऱ्या अर्थाने आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायला पाहिजे होती. एका बाजूला मुख्यमंत्री यांच्यापासून मंत्रीमंडळ सांगत होत की दुसरी लाट मोठी येणार आहे. डीपीडिसीतल पैस सत्ताधारी आमदारांनी आपापल्या मतदार संघात वाढवून नेले. तेच पैसे आरोग्यसाठी का वापरले नाहीत. 25/15 फंड ग्रामीण विकास खात्या अंतर्गत सत्ताधारी आमदारांनी मतदार संघात रस्ते, गटर करायला आणि ठेकेदारांना पोसायला आणि टक्केवारी खायला 20 /20 कोटी तुम्ही दिल हे त्या त्या जिल्ह्याला आरोग्य विभागासाठी वापरलं असतं, बेड उपलब्ध केले असते व्हेंटिलेटर घेतले असते, रेमडेसीव्हरचा साठा उभा केला असता तर ह्या प्रत्येक जिल्ह्यातील जनतेचं आज जे हाल अपेष्टा चालल्या आहेत त्या राहिल्या नसत्या.
प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर शासकीय दवाखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लँट उभे केले असते तरी सुद्धा ऑक्सिजन तुटवडा भासला नसता.परंतु शून्य काम केले. प्रत्येक वेळी उठ की सूट बोट मात्र केंद्राकडे दाखवायचे. ऑक्सिजन संपला केंद्राने द्यावा, व्हेंटिलेटर संपला केंद्राने द्यावा, व्हक्सिन केंद्राने द्यावीत आणि आज केंद्राने जाहीर केलं की सर्व लोकांना व्हॉक्सीन मोफत देणार आणि मुख्यमंत्री यांच्यापासून मंत्रिमंडळातले म्हणतात की 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांना व्हक्सिन फ्री देणार म्हणजे केंद्राने सांगितले की तुम्ही सांगता म्हणजे शेजाऱ्या पोरग झाल्यावर त्याच बारसं घालायला तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला लेकरं बाळ हुणार आहेत का ? हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही कधी बघणार जनतेकडे .या राज्यातील जनता अक्षरशः औषध उपचारविना किड्या मुंग्यांसारखी तडफडून मरत आहे. सरकारने किमान पालकमंत्री यांना तरी आपापल्या जिल्ह्यात जायला सांगावं आढावा घेऊन सुविधा देण्याचे आदेश द्यावेत अशी टिप्पणी केली.