जिल्हाधिकाऱयांना निवेदन : शिक्षण-आर्थिक बाबतीत समाज मागे
प्रतिनिधी / बेळगाव
मादिग समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे. या समाजाचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विकास व्हायचा असेल तर ए. जे. सदाशिव आयोग लागू करणे महत्त्वाचे आहे. त्या आयोगामुळे या समाजाला सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. तेव्हा हा आयोग लागू करावा, अशी मागणी मादीग संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मादीग समाजाला सध्या जे आरक्षण आहे ते अत्यंत अल्प आहे. त्यामुळे शिक्षण तसेच आर्थिक बाबतीत हा समाज मागे पडला आहे. कोणत्याच सुविधा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत, त्यामुळे हा समाज मागासलेला आहे. या समाजासाठी ए. जे. सदाशिव आयोगाने जी तरतूद केली आहे ती लागू करणे गरजेचे आहे. तेव्हा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा आयोग लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजू म्हैशाळे, महादेव ऐहोळ, बाबासाहेब केंचण्णावर, गोपी बळ्ळारी, फकिराप्पा तळवार, प्रकाश ऐहोळ, जयपाल ऐहोळ, केंपण्णा म्हैशाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.