वृत्तसंस्था/ बेंगळुर
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेत कमालीची उदासिनता अनुभवायला मिळते आहे. भारतात मार्चमध्ये डिजिटल पेमेंट व्यवहारामध्ये चांगलीच घट झाली आहे. डिजिटल पेमेंट 46 टक्क्यांनी घटून 156 ट्रिलियनवर पोहचले आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये 292 ट्रिलियन पेमेंटची भर पडली होती. व्यवसायात पैशाची गरज पुरवण्यात डिजिटल माध्यमाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो आहे. वेळेची बचत करणारा हा पर्याय असल्याने अनेकजण यामार्फत व्यवसायातील देणी देत असतात. मार्च 25 नंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले. त्य़ामुळे पैशांचे व्यवहारही ठप्प झाले. अशा व्यवहारांमध्ये आरटीजीएसच्या माध्यमातून देणी (पेमेंट) दिली जातात. कॉर्पोरेट कंपन्या, गुंतवणूकदार व अतिसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक या डिजिटल प्रणालीचा पैशांच्या देवाणघेवाणीसाठी उत्तम वापर करून घेतात. हे प्रमाण वार्षिक तत्वावर 80 टक्के इतके असते, त्यात आता 37 टक्क्यांची घट झालीय.