ऑनलाईन टीम / मुंबई
मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने गेल्या तासाभरात पासून रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच काबुला वेधशाळेने मुंबई शहराला उपनगरासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढच्या 24 तासात पालघर आणि कोकण किनारपट्टी सह दक्षिण मध्य भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत काही भागात 65 ते 115 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरे, ठाणे, मिरा भाईंदर मध्ये 10 ते 20 मिमी पाऊस झाला.
मुंबईत समुद्र भरती मुळे संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी सायंकाळी समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.