ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत स्वस्तात रुग्णसेवा देणारे वाडिया रुग्णालय सध्या निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून या रुग्णालयाला येणारा निधी थकल्यामुळे रुग्णालयातील औषध साठा संपला आहे.
वाडिया रुग्णालयाचा 200 कोटींपेक्षा अधिक निधी राज्य सरकार आणि महापालिकेकडे अडकला आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे. रुग्णालयातील औषध साठा संपल्याने मागील आठवडाभरापासून रुग्णालयातील नवीन रुग्णांची भरती थांबविण्यात आली आहे. तर 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाह्यरुग्ण विभागाबरोबरच शस्त्रक्रिया विभागही हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया रुग्णालयात सध्या सुरू आहेत.
स्वस्त दरात रुग्णसेवा मिळत असल्याने राज्यातल्या कानाकोपऱयातले लोक या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, सरकारच्या निधीअभावी रुग्णाचे हाल होताना दिसत आहेत. औषधविपेते तसेच वैद्यकीय सुविधा पुरवणाऱयांची कोटय़वधी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी औषधे द्यावी लागतात, त्यांचा मोठय़ा प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. औषधे आणि वैद्यकीय सुविधांची उपलब्धता नसताना वैद्यकीय उपचार कसे सुरू ठेवणार असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला होता. त्यामुळे नाईलास्तव रुग्णालयाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे रुग्णालच्या अधिष्ठाता शंकुलता प्रभू यांनी सांगितले.