उस्मानाबाद / प्रतिनिधी
सीमाभागास महाराष्ट्रात घेण्यासंदर्भात ” बेळगावप्रश्नी कायतरी विचार करु..” असे विधान माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते उस्मानाबादच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आल्यावर माध्यमांशी बोलत होते.
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कायमच बेळगाव हा मराठी भाषेचा अविभाज्य घटक असल्याने तो महाराष्ट्रात आला पाहिजे. असा ठराव होतो. त्यामुळे बेळगावप्रश्नी सरकारकडून काही निर्णय होणार का ? अशी विचारणा माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्रकारांनी केली होती. त्यावर ते उत्तरले.
प्रसंगी पुढे बोलताना शिंदे म्हणाले , कुठल्याही प्रांतात भाषेला विरोध करणे चुकीचे आहे. साहित्याचा प्रवाह कोणीही रोखू शकत नाही. एकीकडे भारतीय भाषा बाजूला ठेवता. आणि दुसरीकडे इंग्रजी, फ़्रैंच अशा भाषाचा अभ्यास करायचा. शेक्सपियरच्या साहित्याला जवळ करायचे. हे चुकीचे आहे.असेही यानिमित्ताने ते म्हनाले.
बेळगावनजीकच्या कुद्रेमनी येथील सहित्य संमेलनात श्रीपाल सबनीस यांच्यासह , मराठी सहित्यंकाची होणारी अडवणूक चुकिची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.