वाळपई / प्रतिनिधी
शेळ मेळावली येथे आयआयटी प्रकल्पविरोधी आंदोलन अजूनही सुरूच आहे. मात्र या आंदोलनाने आता हळूहळू सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात वळण घेताना दिसत आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांचा आयटी विरोधी आंदोलनाला बरोबर जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात जोर वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आतापर्यंत या आंदोलनामध्ये पंधरा गावांचा पाठिंबा लाभला असून आज पंचायत क्षेत्रातील पाल गावातील नागरिकांनी पदयात्रा काढीत या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. आयआयटी प्रकल्प रद्द करा व जमीन मालकीचा प्रश्न सोडवा अशा प्रकारची मागणी या आंदोलकांनी केली आहे .यामुळे येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयातील सर्वच गावातील जनता जमीन मालकीच्या प्रश्नावरून आंदोलनावर भर देणार असल्याचे समजते. वाळपई आमदार विश्वजीत राणे यांनी आयआयटी प्रकल्प रद्द करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आल्यानंतर आंदोलनातील प्रखरता काही प्रमाणात दूर झाल्याचे चित्र दिसत असले तरीसुद्धा जमीन मालकीचा प्रश्न मात्र अजूनही या आंदोलनाच्या माध्यमातून धगधगताना दिसत आहे.
गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली याठिकाणी उभारण्यात येणाऱया असलेल्या आयआयटी प्रकल्पाचे आंदोलन गेल्या पंधरा दिवसांपासून प्रखर झाले होते. मात्र वाळपई आमदार तथा आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी सदर प्रकल्प रद्द करावा व सत्तरी तालुक्मयातून तो इतरत्र स्थलांतरीत करावा अशा प्रकारची मागणी केली होती. या संदर्भातील पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पाठविल्यानंतर या आंदोलनातील प्रखरता दूर झालेली आहे. भूमापन करण्याचे काम सध्यातरी बंद करण्यात आल्यानंतर आंदोलनामध्ये काही प्रमाणात शांतता दिसत असली तरी सुद्धा जोपर्यंत अधिकृतरित्या सरकार या प्रकल्पासंदर्भात आपली घोषणा करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे .
आता मात्र याआंदोलनाने सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात जोर दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कारण ज्याठिकाणी आयआयटी प्रकल्प उभारण्यात येत आहे .सदर जमीन बऱयाच वर्षांपूर्वी या भागातील भूमिपुत्रांच्या नावावर होती.मात्र मध्यंतरी कागदपत्रांमध्ये घोळ निर्माण करून सदर जमीन सरकारच्या मालकीची असल्याचे कागदपत्रे तयार करण्यात आली .ही जमीन सरकार मालकीची असल्याचे कारण पुढे करून सरकारने याठिकाणी आयआयटी प्रकल्प उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या. यामुळे पुन्हा एकदा जमीन मालकीच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलनामध्ये भर पडताना दिसत आहे. सरकारने याजमिनी व सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात धोरण निश्चित करावे अन्यथा येणाऱया काळात हा प्रश्न सत्तरी तालुक्मयामध्ये धगधगणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सत्तरी तालुक्मयातील हे ऐतिहासिक स्वरूपाचे आंदोलन आहे .आयआयटी प्रकल्पाच्या माध्यमातून विरोधाची धार शुल्लक वाटत होती . मात्र आता या आंदोलनाने मोठा पेट घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न हा गोवा मुक्तीनंतरच्या ते आतापर्यंत अधांतरी राहिलेला आहे .यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नावर आता भर पडताना दिसत आहे. सत्तरी तालुक्मयातील जवळपास चौदा 14 गावांनी आंदोलनाला पदयात्रा काढली व प्रत्यक्षपणे उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आज सकाळी ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील पाल गावातील नागरिकांनी वाळपई शहरातून मोर्चा काढीत या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. आयआयटी प्रकल्प रद्द करा व जमीन मालकीचा प्रश्न सोडवा अशा प्रकारची एकमुखी मागणी सदर मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत होती.
पाल ग्रामस्था?ची महत्त्वाची बैठक.
दरम्यान जास्त माहितीनुसार या संदर्भात एक महत्वाची बैठक पाल ग्रामस्था?ची देवस्थानच्या सभामंडपात संपन्न झाली. यावेळी जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात व आयआयटी प्रकल्पाच्या बाबतीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली .सत्तरी तालुक्मयातील सर्वच गाव जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात व आयआयटी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहे .सत्तरी तालुक्मयातील सर्व जनता आमचे बांधव आहेत. त्यामुळे ते मेळावली भागातील बांधवावर निर्माण झालेले संकट येणाऱया काळात आमच्या मानगुटीवर बसण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .यामुळे आता कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता येणाऱया काळात या आंदोलनाला सहभाग होऊन सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न सुटावा यासाठी सर्वांनी या आंदोलनाला वैयक्तिक स्वरूपाचे मतभेद विसररुन व्यक्त करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला .यावेळी सातेरी व भागातील देवदेवतांना साकडे घालून सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा सर्व नागरिक देवस्थानच्या प्रांगणामध्ये जमून पदयात्रा काढत या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. वाळपई शहरातून पदयात्रा निघताना आयआयटी प्रकल्प रद्द करा व सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न सोडवा अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. तदनंतर पदयात्रा काढीत सदर ग्रामस्थ मेळावली भागातील आंदोलनामध्ये सहभागी झाले.
दरम्यान आयटी प्रकल्पाच्या आंदोलनाचे सत्र सुरूच आहे .आजही नियमितप्रमाणे मोठय़ा प्रमाणात आंदोलकांनी थल्मीदेवस्थानच्या प्रांगणात जमून आंदोलन केले. सरकारने भूमापन करण्याचे काम जरी बंद केले असले तरीसुद्धा जोपर्यंत अधिकृत स्तरावर हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केलेले आहे. सरकारने आयआयटी प्रकल्प रद्द केल्यानंतर हे आंदोलन अजिबात संपणार नाही. जमीन मालकीचा प्रश्न आजही प्रलंबित राहिलेला असून जोपर्यंत सरकार दरबारातून या प्रश्नासंदर्भात अधिकृत धोरण जाहीर केले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि मागे घेणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे..
विश्वजीत राणेच्या मागणीबाबत सरकारचे मौन.
मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी हा प्रकल्प सत्तरी तालुक्मयातील इतरत्र स्थलांतरीत करावा अशा प्रकारची मागणी जारी केलेल्या एका चित्रफितीच्या माध्यमातून व मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. दोन दिवस झाले त्याचा मागणीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे . शेळ मेळावली बचाव समितीने विश्वजित राणे यांची मागणी म्हणजे एक प्रकारचे षडयंत्र असल्याचा आरोप केलेला आहे .मात्र त्यांनी हा प्रकल्प जनतेच्या हीताआड होत असेल तर तो इतरत्र स्थलांतरित करण्यास योग्य असल्याचे विश्?वजित राणे यांचे म्हणणे आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात अजून पर्यंत सरकार किंवा मुख्यमंत्र्यांनी अजिबात स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याचप्रमाणे आयटी प्रकल्पासंदर्भात सरकारच्यावतीने अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे सरकारी पातळीवर नक्की चालले काय अशा प्रकारचा सवाल आता आंदोलक व नागरिक विचारताना दिसत आहे. सध्यातरी या प्रकल्पाचे भवितव्य सर्वतोपरी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हातात आहे. यामुळे ते ह्या प्रकल्पासंदर्भात कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. त्याचप्रमाणे जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात या भागातील नागरिकांनी दिलेला जोर या पार्श्वभूमीवर सरकार याबाबतीत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिलेले आहेत.