प्रतिनिधी/सातारा
शाळेचा पहिला दिवस म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींना, शिक्षवर्गांना पुन्हा नव्याने भेटणे, सुट्टीच्या गम्मती-जमती सांगणे, तसेच शिक्षकवर्गांतर्फे शाळेत नव्याने दाखल होणाऱया विद्यार्थ्यांचे स्वागत करणे या सर्वांवर कोरोनामुळे मागील वर्षा प्रमाणे यंदाही पाणी फेरले आहे. प्रतिवर्षी दि. 15 जुन रोजी नुतन शैक्षणिक वर्षाचा प्ररंभ करण्यात येते. सुट्टीचा कालावधी संपून पुन्हा या दिवसांपासुन शाळांचा आवार विद्यार्थ्यांनी गजबजायला सुरूवात होते. पण यंदाचे हे चित्र काहीसे वेगळे होते.
कारण शाळा आवारात केवळ शिक्षकवर्गच पहावयास मिळत होते. तसेच विद्यार्थी प्रात्यक्षात समोर नसताना ऑनलाईनच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत होते. हे चित्र पाहता ज्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची ओढ लागली आहे, तितकीच ओढ शिक्षकवर्गांनाही विद्यार्थ्यांची लागलेली आहे, असे दिसत होते.
मंगळवार पासुन आता नियमित पणे सकाळी 10 ते 5 वा. शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हय़ात सध्या कोरोनाचा कहर ओसरत असल्याने सर्व शिक्षकवर्गांना शाळेत उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातुन शिक्षण देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी सर्व शाळांमध्ये शिक्षक उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत होते.