प्रतिनिधी/ सातारा
मागील काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या वाढीनंतर शुक्रवारी तर शहराचे तापमाण 40 शी पार गेले होते. यावर्षी पहिल्यांदाच तपमाण इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढले होते. त्यातच येत्या आठवडाभरात अशाच प्रकारचे तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्ताविली आहे. त्यामुळे सातारकर चांगलेच हैराण झाले आहेत. एकंदरीतच वातावरण पाहता सुर्य खरोखरच आग ओतु लागलाय असे जाणवत आहे.
अगदी सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दुपारच्या सुमारास तापमानाने उच्चांक गाठत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसा जरी उन्हाच्या झळा बसत असल्या तरी रात्री ची ही परिस्थित काही वेगळी नाही. रात्री वारे नसल्याने जवळपास सर्वच घरात वाताणुकुलीत साहित्यांचा वापर करण्यात येत आहे. पण त्यातुन ही नैसर्गिक वारे येत नसल्याने नागरिक चांगलेच हैराण होत आहे. बरेच जण तर अंगणात किंवा टेरेसवर झोपत आहेत.
मागील काही दिवस सातात्याने तापमाणात वाढ होत असुन या महिन्यात 20 रोजी-39.10, 21 रोजी-38.09, 22 रोजी-39.01, 23 रोजी-37.05, 24 रोजी-36.08, 25 रोजी-38.09, 26 रोजी-38.08, दि. 27 रोजी-40.6, दि. 28 रोजी-40.7 व दि. 29 रोजी-41.2 इतकी तापमाणाची नोंद करण्यात आली आहे. यातपमाण वाढीच्या परिणाम आरोग्यावर होत असुन, उष्माघाताचे प्रमाण ही वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या शरीराचे संतुलन व्यवस्थित ठेवण्याकरीता मुबलक प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजे आहे.
आधीच उन्हाळा त्यात भारनियमन
सध्याच्या वातावरणामुळे एक क्षण ही फॅन, कुलर, एसी सारख्या वातावरण कुलीत साहित्या शिवाय घालविणे गठीण झाले आहे. त्यातच विद्युत पुरवठा वारंवार खंडीत करण्यात येत असल्याने सर्वच सातारकर चांगले हैराण झाले आहेत. कारण वाढत्या पाऱयाने अंगाची चांगलीच लाही-लाही होत आहे. आधीच उन्हाळा त्यात हा भारनियन सोसवेना अशी भावना नागरिकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
वाहने तापु लागली
सध्याच्या या कडाक्याच्या उन्हाचा परिणाम वाहनांवर ही होताना दिसत आहे. कारण भर उन्हात उभा करण्यात येणारे विशेषतः दुचाकी वाहने चांगलीच तापतात. त्यामुळे अनेक वाहनांचे टायर ही फुटण्याचा किंवा वाहनातील हवा कमी होणाचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अनेक ठिकाणी डांबरी रस्ते असल्याने उन्हाने डांबर अधिक प्रमाणात तापत आहे, व याचा परिणाम वाहनांच्या चाकांवर होत आहे.
गृहीणींकडून स्वयंपाक उरकुन घेण्याची घायी
वाहढत्या तापमाणामुळे गॅस पुढे उभे राहुन स्वयंपाक करणे ही त्रास दायक ठरत आहे. त्यामुळे अनेक गृहीणींकडुन अगदी उन्हे येण्या पुर्वीच म्हणजे सकाळी 10 वा. पुर्वीच स्वयंपाक उरकुन घेण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात ही अनेक महिलावर्ग शक्यतो भर दुपारच्या सुमारास शेतात जाणे टाळत आहेत.